सौहार्द हेच सर्वात जास्त हितकर आहे. विवेकानंदांची शिकवण.


■■ स्वामी विवेकानंदांनी बेलूर मठाची स्थापना करताना देखील सौहार्द या गोष्टीला हायलाईट केले होते.
बघा त्यांच्या या पुस्तकातील उतारा.  
पुस्तक : श्री विवेकानंद चरित्र
अर्थ : ●बेलूर-मठाच्या उद्दिष्टांबद्दल विवेकानंद स्वामी म्हणाले: 'हे एक असे केंद्र असेल जिथे श्री रामकृष्णांच्या जीवनात दाखवल्याप्रमाणे सर्व पंथ आणि श्रद्धा यांच्यातील भव्य सुसंवाद साधला जाईल आणि त्याचे आचरण केले जाईल. आणि केवळ त्याच्या वैश्विक पैलूमध्ये धर्माचा उपदेश केला जाईल. 
आणि या ठिकाणाहून वैश्विक सहिष्णुतेच्या हेतुपूर्वक सद्भावना, शांती आणि सौहार्दाचा तेजस्वी संदेश निघेल. जो संपूर्ण जगात पसरेल. जर आपण निष्काळजी झालो तर सांप्रदायिकता पसरण्याच्या धोक्याबद्दल त्यांनी सर्वांना इशारा दिला.
धर्माचा अर्थ प्रजा धारण करणारा तो धर्म. 
उध्वस्त करणारे ते अधर्म.
सौहार्दा अभावी ती उध्वस्त होत आहे. हे बदलायला हवे.
■ दरवर्षी मला हा अनुभव येतो - काही बांधव दिवाळीच्या शुभेच्छा देतात किंवा वर्षभरात कुठल्यातरी हिंदू सणाच्या शुभेच्छा देतात.
● या व्यतिरिक्त आपण वृत्तपत्रांमध्ये वाचतोच की काहीजण गणेशोत्सवात गणेशाचे किंवा खेडेगावामध्ये देवाच्या पालखीचे पूजन करत सहभागी होतात किंवा माझा एक पेशंट तो नोकरी करत असलेल्या ठिकाणी दर गुरुवारी दत्ताची पूजा करतो.... अशी पुष्कळ उदाहरणे आढळतात.
● मुद्दा असा आहे की आपला सकारात्मक संवाद चालू असणे गरजेचे आहे.  प्रत्येक जणच अगदी दुसऱ्याच्या धर्माचा अनादरच करतो असे काही नाही.
आपली भावना समूह द्वेषाची नसेल, आपण कुठलेही चुकीचे वक्तव्य केले नाही तर संवाद नक्कीच होऊ शकतो.
■ माझ्या त्यांच्याशी होत असलेल्या संवादात काही मुद्दे येतात - प्रार्थना करा, इमानदारी पाळा.
● पण पुस्तकात लिहिलेल्या काही चुकीच्या गोष्टी पाळायलाच हव्यात असं नाही. आम्ही पण आमच्या धर्मातील काही मानवतेला पोषक नसलेल्या अशा काही गोष्टी पाळत नाही.
● कुठल्याही नावाने ओळखा; पण ती शक्ती एकच आहे. तुम्हाला त्या शक्तीला जे म्हणायचं ते म्हणा आणि दुसऱ्यांना जे म्हणायचं ते म्हणू द्या.
प्रजेचे धारण करतात त्यांना धर्म असे म्हणतात. सर्व जग आपल्या धर्माच्या छत्राखाली आणण्याची काही एक गरज नाही. त्यातून जगाला कुठल्याही प्रकारचा लाभ होणार नाही. उलट युद्ध व अशांतता वाढेल. 
● ज्यांनी पूर्वी आक्रमणं, रक्तपात, धार्मिक हल्लेखोरी केली त्यांची तळी उचलणे, त्यांना आदर्श मानणे हे योग्य नाही.
ॐ☪︎† अनुभव असा आहे की; या सगळ्या गोष्टी स्वीकारणारे काही जण मला भेटतात. ☺️🙏
प्रयत्न आपल्या हाती बाकी सगळे ईश्वर, अल्लाह,  गॉडच्या आधीन...
🙏🙏

Comments

Popular posts from this blog

herpes treated fast by ayurveda: herpes zoster. PHN or pain after herpes. Herpes simplex well treated. genital herpes.

मानवतेची महागाथा. 29 Humanity Thoughts in Marathi. Complete and unabridged.

HSV very important information. herpes simplex of genital or oral herpes decreased. Herpes ayurvedic treatment. hsv ayurveda treatment.