मानवतेची महागाथा. Humanity Thoughts in Marathi. Complete and unabridged.

                  मानवतेची महागाथा   
     मला उमजलेली मानवता आपल्यासमोर मांडत आहे. हे माझ्या अल्प बुद्धी ला सुचलेले विचार आहेत. आपण यावर विचार करा व पटेल तेव्हढे स्वीकारा व पसरावा. जे पटले नाही ते सोडून द्या. सर्वांचे सर्व मुद्यांवर संपूर्ण एकमत कधी होत नसते. नवरा बायको आई मुलगा यांचे देखील होत नसते. इतरांची तर काय कथा ? हे विचार कसे व कुठून आले त्याची पूर्व पिठीका : मी खूप वेळा बोलत असतो, तशी माझी दोन मने देखील कधी कधी आपसात बोलत असतात ! असाच एक संवाद प्रकट करतोय. मन १ व मन २ अशी सोप्पी नावे देतोय त्यांना. ...
 मन १ - तुला आठवतं का ?
 मन २ - काय रे ? 
 मन १ - बरोबर ४६ वर्ष झाली तू एका बाईंच्या अन्यायाची तक्रार घेऊन शाळेचे सुपरवायझर श्री. कुलकर्णी सरांकडे गेलास तेव्हा ते काय म्हणाले ?
 मन २ - आठवतंय की. ते म्हणाले की तुझी तक्रार नंतर सांग. पण आधी तू काय आहेस ते बघ ? तू काय तुकारामाचा अवतार लागून गेलास काय ?
 मन १ - बरोब्बर.
 मन २ - पण त्याचं आत्ता काय ?
 मन १ - तेच तर ना ? सारखं मानव जागरण म्हणून कोकलतोस पण तुझं काय ? तू काय स्वतःला तुकारामाचा अवतार किंवा मानवतेचा पुतळा समजतोस का ?
 मन २ - हो खरं आहे रे; मला माहीत आहे मी काय आहे ते. उरात किती जखमा आहेत की ज्या अश्वत्थाम्याच्या कपाळातल्या जखमेप्रमाणे भळाभळा वाहत असतात. पण मी असा विचार करतो की आपण माणूस बनण्याचा प्रामाणिक प्रयत्न तर करत आहोत, रोज कणभर का होईना; अधिक चांगला व म्हणून अधिक आनंदी माणूस बनत आहोत. पूर्णत्व प्राप्त होई पर्यंत थांबलो तर जिंदगी खतम् होऊन जाईल आणि माणसाच्या, समाजाच्या व जगाच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेला हा विषय राहूनच जाईल ! मानवतेमुळे आयुष्यात जो हा आनंदाचा अनुभव आपण घेतला तो सर्वांना मिळावा आणि थोडे आणखी चांगले जग होण्यात कणभर वाटा उचलावा म्हणून हा अगाऊ पणां करतो रे. 
                  या विचारांची गंगोत्री :
      मी सामाजिक कामात होतो, हिंदुत्वाचे कामही करत होतो. ते करत असताना मी एका गावी गेलो होतो.  तेथे असे घडले की ज्या घरी मी भेटण्यासाठी गेलो त्या घरातील एक मुलगी की जिला वडिलांच्या आग्रहाखातर संन्यास घ्यावा लागला त्या मुलीच्या डोळ्यातील मला अत्यंत करुणा दुःख दिसले. हे पाहून माझे मन विचार करू लागले की अशा किती तरी घटना, गोष्टी घडतात की ज्यात देवाधर्माच्या नावाने देखील माणुसकीचा विनाश होतो. आर्थिक शोषण लैंगिक शोषण सत्तेचा उनवाद अशा अनेक गोष्टी घडतात. जर तुम्ही धर्मकार्य हे असे करत असाल तर काय उपयोग ? तेव्हा मला अगदी पहिल्यांदा असे वाटले की माणुसकी ही या सगळ्याच्या वर आहे.
     काही घटनांमध्ये असेही दिसते की मोठे सामाजिक काम करणारे, धार्मिक काम करणारे लोक देखील स्वार्थ, अहंकार, मोठेपणा मिरविणे अशा वेगवेगळ्या कारणाने दुसऱ्यावर अन्याय करत असतात. इतकेच काय स्वतःच्या घरातील व्यक्तीवर देखील अन्याय करीत असतात. म्हणून शेवट माणुसकी ही सर्वोच्च आहे अशा प्रकारची भावना वाढीस लागली.
विचार चक्र चालू होते. 
    त्यातच  पुढे एक पुस्तक वाचण्यात आले. ' सेन्स अँड सेन्सिबलिटी ' हे वाचून पूर्ण केलं. वाचायला वेळ लागला जरा; पण मजा आली. हे Jane Austin ने 1815 ला प्रसिद्ध केलं. इंग्रजी क्लासिक्स मध्ये याची गणना होते. 18 व्या शतकातील उच्च मध्यम व उच्च वर्गीय कुटुंबातील मुलींच्या लग्नाची ही कहाणी आहे. ते वाचताना असं लक्षात आलं की; आपण ज्याला पाश्चात्य संस्कृती म्हणून कमीपणाने लेखतो. तसं काही नाहीये. फार काही वेगळं, भोग वादी वगैरे असं पण नाही दिसत. छान सुसंस्कृत लोक होते ते. अर्थात सूक्ष्म दृष्टीने पाहता त्या ठिकाणी विविध प्रवृत्तीचे / प्रकृतीचे लोक होते. असं चित्र दिसतं. तसे माणसा माणसांमध्ये वैविध्य असतेच की! 
पण माणूस इथून तिथून सारखा असं जे मी म्हणतो ते पण इथे स्पष्ट होतं. 19 व्या शतकातील उच्चभ्रू इंग्रज व्यक्ति सारखे अनेक लोक मला माझ्या अवती भोवती आज या 21 व्या शतकात इथे आधुनिक भारतात मध्यम वर्गात आज देखील दिसतात! म्हणजे पुस्तकात दिसणारे 10 प्रकारचे लोक आजही माझ्या भोवती आहेत म्हणूनच म्हणतो की शेवट माणूस येथून तिथून सारखा म्हणजे प्रत्येक जण सारखा नसून सर्व ठिकाणी सर्व प्रकारचे माणसे असतात. हल्ली जे अत्यंत भोगवादी दृश्य आपल्या भोवताली दिसते त्यामागे एकूण जगाचे बदलते चित्र असेच म्हणावे लागेल. नेमकं पाश्चात्यांना दोष नाही देता येणार. उलट 18 व्या शतकाच्या अखेर तिथले युवक / युवती ज्या प्रकारे जोडीदार निवडीसाठी स्वत: भेटत असत, संवाद साधत असत, स्वतः जोडीदार निवडत असत ( पालकांची संमती घेऊन ) वये पण 18 च्या पुढची; हे खूप छान चित्र पाहायला मिळाले. 
   आपण भारतातील जाती व्यवस्थेला दोष देतो तो योग्य आहे कारण जातीभेदाचा अतिरेक झाला ; पण तिथे देखील उच्च नीच भाव दिसतात त्यांच्यात ही खूप सामाजिक भेद, दरी व उच्च नीचतेचे वातावरण दिसून येते! यावरून असा निष्कर्ष काढता येतो की केवळ जातीभेदांमुळेच उच्चनीचता असते असे नव्हे तर ती देखील माणसाची एक सहज प्रवृत्तीच आहे. कादंबरीत नक्कीच त्या त्या ठिकाणचे जीवन दर्शन होत असते म्हणून एका वेगळ्या वेळ / स्थळाच्या वर्णनास एवढे महत्व दिले. माणसं इथून तिथून सारखी च असतील तर इतर कारणांनी होणारे भेदभाव निरर्थक च न्हवेत का? असा प्रश्न मला तेव्हा पडला. सारखी म्हणजे सगळे च अगदी 100 % एकमेकांसारखे असतात असे न्हवे तर 10 प्रकारचे चांगले, 10 प्रकारचे वाईट लोक आणि शिवाय 80 प्रकारचे मध्यम लोक हे सदा सर्वकाळ सगळीकडे होते व आहेत आणि असतील. 
   दुसरे उदाहरण : डायरी ऑफ अन्य फ्रँक मधील लेखिका व नायिका कु. आना फ्रॅंक चे दुःख पाहून मला माझ्या 13 व्या वर्षी मरण पावलेल्या बहिणीची तीव्र आठवण झाली. म्हणजे थोडक्यात काय डायरीतील नायिका ही माझ्या बहिणीसारखी वाटू लागली तिचा अंततोगत्वा होणारा मृत्यू हा माझं हृदय विदारून गेला. तेंव्हाच मला जगाला जोडणाऱ्या मानवतेच्या विचाराचा आगाज सर्व प्रथम झाला. 
     वर सांगितल्याप्रमाणे ज्या मित्राच्या बहिणीला इच्छेविरुद्ध संन्यास दिला गेला तिच्या चेहऱ्यावरील वेदना पाहून असे वाटले की धर्म हाच जर असे करू लागला तर कसे व्हायचे ? इतर अनेक धर्मसंत देखील माणुसकीचा गळा घोटतात. शिवाय विभिन्न धर्मातील काही मुद्दे काही मार्गदर्शन मानवतेच्या अगदी विरुद्ध आहेत मग धर्माचा अर्थ काय राहातो ? म्हणून आजच्या मानवाला हवाय एक वेगळा विचार असे जाणवले. तीच आहे ह्या विचारांची व कामाची पूर्व पिठिका असे म्हणता येईल.
 त्यातून काही प्रश्न पडले व त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. तुम्ही स्वतः सगळे वाचा, विचार करा आणि तुमचे विचार फायनल करा. जर आपण सहमत झालो तर ह्या विचारांचा प्रत्यक्ष वापर करणे तुमच्या आयुष्याला उपयोगी असेल असा माझा कयास आहे.             नेमकी काय आहे मानवता ? 
मानवता म्हणजे माणुसकी. पुढे त्याचे अधिक विवरण करीन आत्ता एवढे सांगतो की; ही संकल्पना आदर्श काय असावा त्याचा विचार करून रचली आहे. शब्दश: अर्थ न्हवे. मानवता म्हणजे सर्व जण सुखी व्हावेत यासाठी असणारी अव्याहत खटपट. मानवता म्हणजे दुसऱ्याचा विचार करायचा, कोणाला दु:ख द्यायचं नाही आणि कोणाचं शोषण करायचं नाही. मानवता म्हणजे स्त्री, दलित, गरीब, कृष्ण वर्णीय यांना पीडा न देता उलट समान वागणुक देणे. मानवता म्हणजे समूह करून इतर जगाला आपल्या आधिपत्याखाली आणून नाडायचे नाही. मानवतेचा विरोध असतो - शोषक, भ्रष्टाचारी व क्रूरकर्मा असणाऱ्या रावण, चन्गेज खान, हिटलर आणि दुर्योधन यांना! मानवता म्हणजे वेळ पडली तर योग्य न्याय व्यवस्थेने त्यांना शासन करणे. मानवता म्हणजे आधी माझ्यातले दोष मी दूर करणे व अधिक चांगला माणूस बनण्यासाठी सतत प्रयत्न करणे. आणि ते करत असताना इतरांना पण त्यासाठी जागृत करणे. मानवता म्हणजे सत्य, प्रेम, करुणा व बंधुभाव. ह्या मार्गांने गेले असता संपूर्ण जगातील मानवाचे भले होणार आहे. खरे तर वाईट गुण हा देखील मानवी स्वभावाचा भाग आहे. चांगले वाईट आणि कुरूप हे एका हॉलीवुड चित्रपटाचे शीर्षक होते. [good bad & ugly ] जिथे सर्व मानवी स्वभाव अतिशय सुंदर पद्धतीने चित्रित केले गेले आहेत. गाढवाचा गाढवापणा तसे माणसाची वृत्ती माणुसकी हा अगदी शब्दश: अर्थ झाला. त्यात चांगले, वाईट व ग्रे असे सगळेच आले. पण येथे मानवतेबद्दल बोलताना; चांगले माणूस होण्यासाठी, जगाच्या कल्याणासाठी आपण ते वरील प्रमाणे परिभाषित करत आहोत. मानवतेची व्याख्या : आपण चांगले असणे आणि इतरांसाठीही चांगले करणे अशी केली आहे. विचार ही अतिशय मूलभूत गोष्ट आहे. विचार बदलल्याने जीवन बदलते. चांगले विचार आणि त्यांचे जीवनात अनुसरण ही कोणत्याही गोष्टीपेक्षा सर्वात शक्तिशाली शस्त्रे असू शकतात. आपण येथे सर्वांना नेहमी विचारपूर्वक वागण्याचे आवाहन करतो आणि कोणाला काहीही उपदेश करत नाही. कोणाला काही जोर जाबरदस्ति देखील नाही. आम्ही बोलतोय त्यातले योग्य काय अयोग्य काय हे तुम्ही ठरवा आणि करा. आणि गेल्या अनेक वर्षांपासून मी स्वतःपासून याची सुरुवात केली आहे. वरील जी व्याख्या मानवाच्या चांगल्या गुणांच्या संदर्भात करतो; हा एक प्रकारचा इच्छापूर्ण विचार आहे. It’s a wishful thinking. ‘ चांगले असणे आणि चांगले करणे ‘ हीच मानवता. प्रत्येक व्यक्ती एक चांगला माणूस बनल्याने एक चांगला समाज तयार होईल. आणि एक असे विश्व की जे आपल्याला राहण्यासाठी एक चांगली जागा असेल. हेच मानव जागरणाचे खरे ध्येय आहे. हे एक स्वप्न रंजन वाटेल पण ठीक आहे. ज्ञानेश्वर तुकाराम अशा संतश्रेष्ठ माऊली ने केले आपण पण करूया. हे सर्व जाणण्यापूर्वी; मानवतेचा इतिहास काय सांगतो ते पाहूयात. ही माहिती आपल्याला आपले ध्येय अधिक सहजतेने पोहोचण्यास मदत करू शकते. कसा होता जुना माणूस ? संस्कृती, धर्म आणि मानवता - वस्तुतः माणसाची पाहिली जात 25 लाख वर्षांपूर्वी आली. आपण जे आहोत होमो सेपिअन्स ते 2 लाख वर्ष पृथ्वीवर आहोत. आणि मूळ निवासी वगैरे जे वाद उभे केले जातात त्याच्या जर मुळाशी जायचं म्हणलं तर सगळ्यांचंच मूळ आफ्रिकेत आहे! हे इथे नमूद करून पुढे जाऊया. ज्याला आपण सध्या माणुसकी वगैरे असे म्हणतोय तर ती केव्हाच विकून खाल्ली आणि आपण माणूस हे या जगाचे राजे या स्थितीला आलो हे ही नमूद करतो. भीती व हौस या पायी आपण इतर प्राण्यांवर हल्ला केला व विनाश पण केला आहे. मानव निसर्गाचाच भाग आणि निर्मिती आहे त्याला लाभलेली बुद्धीमत्ता, लोकसंग्रह, लोकसंपर्क, ज्ञान वाटून घेण्याचे स्किल्स इत्यादी गोष्टींमुळे 25 लाख वर्ष पृथ्वी वर असूनही नगण्य असलेला हा मानव फक्त गेल्या 25000 वर्षात जीवन साखळीच्या सर्वोच्च स्थानी पोचला आहे. आपल्या प्रजातींना आज होमो सेपियन्स म्हणतात. होमो प्रजातींमध्ये पूर्वी इतर प्रजाती होत्या, ज्या आज नाहीत, फक्त आपण सेपियन्स उरलो आहोत. सेपियन्सचा, म्हणजेच आपण मानवांचा इतिहास अनेक घटनांनी ठासून भरलेला आहे. आम्ही जगात अव्वल स्थानावर नव्हतो पण तिथे पोहोचलो. याची अनेक कारणे आहेत, ज्यामध्ये बुद्धिमत्तेबरोबरच संघटनाही महत्त्वाची आहे. पण हा इतिहास आज ज्याला आपण माणुसकी म्हणतो त्या मानवतेचा राहिला नाही, तो अतिशय हिंसक पण राहीला आहे. आपण केवळ महाकाय सस्तन प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट केल्या नाहीत तर इतर मानवी प्रजाती देखील नष्ट केल्या आहेत. ... अर्थात दुसऱ्या बाजूने तो त्याचा जगण्यासाठीचा संघर्ष होता हे देखील खरेच आहे. न लढता न हिंसा करता अहिंसा केली असती तर महाकाय प्राणी त्याला खाऊन मोकळे झाले असते... भक्षक प्राण्यांमध्ये देखील स्वतःच्या प्रजाती नष्ट करण्याचा इतिहास नाही. वाघ सिंहा हे दोघेही मांजर कुटुंबात आहेत.पण त्यांच्यात असा हिंसाचार क्वचितच होतो. मात्र माणसात मात्र युद्धे, महायुद्धे आणि गटा गटांमध्ये हिंसाचार होताना दिसतो. पण ते वास्तव आहे. जे कदाचित आपल्या जीन्समध्येही आले असावे. थांबता थांबत नाहीये हा भयानक हिंसाचार. त्यामुळे च जवळ जवळ ८ अब्ज एवढ्या प्रचंड संख्येने आपण पृथ्वी व्यापली आहे. लोकसंख्येचा स्फोट हा दोष असेल तर तो फक्त मानवाचा नाही. त्याला निसर्गाने च दिलेल्या कुशाग्र बुद्धीचा पण आहे. त्याने मुद्दाम काही केलं असं नाहीये तर हळूहळू एक एक शोध लागत गेल्याने तसे होत गेले. महाकाय आणि बलाढ्य असे वाघ,हत्ती साधी एक सुई सुद्धा निर्माण करू शकत नाहीत आणि माणूस एक एक गोष्ट सुई पासून आज रोबो पर्यन्त गोष्टी बनवत गेला ते केवळ त्याच्या बुद्धी मुळे. आता त्याच्या वाढलेल्या एवढ्या मोठ्या संख्येमुळे व शोधां मुळे पर्यावरणावर नक्कीच वाईट परिणाम झाला आहे. आता हवे आहे माणसाचे अधिक चांगला माणूस बनणे की जो पर्यावरणाची होता होईल तेवढी रक्षा करेल, प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होण्यापासून वाचवेल. ते पर्व आता सुरू झाले आहे. आता त्याच बरोबर मानव - मानव संबंध सुधारणे अत्यावश्यक आहे. स्वार्थ, हव्यास, भोगवाद, धार्मिक किंवा वांशिक विस्तारवाद, जगावर सत्ता प्रस्थापित करणे इत्यादी कारणाने तो हिंसक, क्रूर बनतो आणि स्वतःचा देखील विनाश ओढवून घेतो आहे. त्यामुळे आपण कुटुंबापासून ते संपूर्ण जगापर्यंत सर्वत्र अशांतता माजवत आहोत. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे, दुसऱ्याचा पण विचार करावा एवढ्या सोप्या सूत्राने म्हणजेच Harmony व Humanity या 2 H च्या साहायाने पुढे जाता येईल. मानवाचा साधारण ज्याला ऐतिहासिक म्हणतो तो काळ 70, 000 वर्षाचा झालाय. या काळात हळू हळू culture म्हणजे संस्कृती निर्माण होऊ लागल्या. या संस्कृतींनी माणसाला प्राण्यांपेक्षा वेगळ्या काही गोष्टी करण्यास प्रवृत्त केलं. इतर प्राण्यांच्यात त्यांच्या त्यांच्या genes प्रमाणे वर्तन घडते. आफ्रिकन सिंह संस्कृती आणि गीर सिंह संस्कृती असे भिन्न काही नसते! एक प्रकारे मानवतेचा उदय देखील इथेच झाला. यात माणसाने दुसऱ्या माणसाशी कसे वागावे, समूहात कसे वागावे याचे काही नियम, रूढी वगैरे विकसित होऊ लागल्या. पुढील हजारो वर्षात मग अनेक संस्कृती विकसल्या, काही लयाला सुद्धा गेल्या. पण तरी त्या सर्व संस्कृति नी माणसाच्या माणूस म्हणून विकसित होण्यात सहभाग घेतला. तो ठसा कायम राहिला. त्यामुळे कोण एकट्या च संस्कृतीला मानवतेचा मक्ता मुळी सुद्धा देता येणार नाही. जरी एखादि संस्कृती लयाला गेली असली तरी देखील तिचे योगदान राहिलेच आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या मध्ये विविध कारणांनी mixing सुद्धा झालेले आहे. या संस्कृती मध्ये वरील बाबींखेरीज - कला, क्रीडा यांचा विकास आहे, शिवाय नीतिमूल्यांचा ही समावेश आहे. त्यातून पुढे ईश्वराच्या संकल्पना मानवी मनात अंकुरल्या. तो एक मोठा टप्पा होता. मग त्याभोवती धर्मांचा विकास देखील होत गेला. युवल या अत्यंत बुद्धिमान आणि जाणकार व्यक्तीने लिहिलेला हा मानवजातीचा इतिहास आहे. आपण जर मानवाचा इतिहास वाचलात तर असं लक्षात येईल की 12000 वर्षांपूर्वी शेती ची सुरुबात झाली की ज्या मुळे सर्व काही बदलून गेलं आहे । त्या आधी आवश्यक तेवढी शिकार व foraging हाच अन्न प्राप्त करण्याचा मार्ग होता. ना कोणाची मालकी, ना ग्राम रचना. मात्र एकदा का शेती आल्यावर स्थैर्य हवेसे वाटू लागले आणि एक एक रचना सुरू झाल्या. ग्राम ते देश खंड वगैरे. चांगल्या की वाईट सोडून द्या पण त्या irreversible आहेत । त्यामुळे सर्व प्रकारची कामे करणारा माणूस आज ही आवश्यक च आहे. पालकांच्या स्थितीचा फायदा मिळणे व वडिलार्जित संपत्ती ची मालकी मिळणे हा देखील व्यवस्थेचा भाग मोडता येणारा नाही. कम्युनिस्ट जगात ते प्रयोग वाईट रित्या हुकले आहेत. आत्यंतिक समता शक्य नाही. सर्व कामांना प्रतिष्ठा, प्रत्येक माणसाला माणूस म्हणून वागणूक देणे हीच आताच्या काळात उत्तम मानवता वादी मानसिकता असेल. पण हेही निश्चित आहे की मानवाने हजारो वर्षांपासून सर्वांच्या कल्याणाचा विचार सुरू केला आहे. बुद्ध किंवा ख्रिस्त किंवा सर्वात जुने उपनिषद लेखक, संत किंवा ऋषि मुनी हे सर्वच जण सर्व समाज सुखी राहावा म्हणून झिजले. त्यांनी मानवाला दया, क्षमा, प्रेम आणि शांतीचे धडे दिले हे खरे आहे. आणि काही प्रमाणात तो स्वीकारून अमलातही आला आहे. असे असूनही, युद्धे होत राहिली आणि ती टाळण्यासाठी प्रयत्न केले गेले. भयंकर महायुद्धानंतर अखेर संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली, अनेक चुका व कमतरता असल्या तरी जगाने आजपर्यंत पुढील महायुद्ध टाळले आहे! त्यातून आपल्या समजुतीनुसार अर्थ काढून दीर्घकालीन आणि एकूणच आनंदासाठी परिस्थितीनुसार निर्णय घेतले पाहिजेत. अत्यंत जुना असा आस्तेक लोकांची संस्कृती व धर्म मॅक्सिको मध्ये अस्तित्वात होती. इकडे सिंधू नदीच्या खोऱ्यात आपली indus / हिंदू संस्कृती व धर्म विकासला. रोमन आहे babilion आहे अशा अनेक झाल्या काही राहिल्या काही गेल्या.. आणि बाकी इतिहास समोरच आहे. अनेक संस्कृती व धर्मानी आपल्याला माणुसकी शिकवली. मात्र त्याच्यातील चुकीच्या शिकवणुकी किंवा प्रथा परंपरा भक्षक देखील ठरलेल्या आहेत. भिन्न धर्मातील स्पर्धा यामुळे माणुसकीचे नुकसान देखील केले. अत्यंत विकसित तत्वज्ञान असलेले धर्म देखील याला अपवाद नाहीत. संस्कृती, धर्म त्यांचे नीतिनियम तसेच मधल्या काळात जी अनेक राष्ट्रे निर्माण झाली त्यांचे कायदे कानून यांच्या माध्यमातून माणसाच्या वर्तनावर मर्यादा आणणे, लोकशाही, मानवी हक्क इत्यादी अनेक रूपाने त्याचे विचार प्रगल्भ करणे या माध्यमातून देखील माणुसकी विकसित होण्याची प्रक्रिया चालू आहे. आणि त्याला खोडा घालणाऱ्या प्रवृत्ती व युद्धे ही पण आज अस्तित्वात आहेत. काहीवेळा सेल्फ गोल प्रमाणे धर्मानी जगाचे नुकसान देखील केलं आहे. 300 वर्षे चाललेली सेमेटिक लढाई असो की शेजारी माणसाचे माणूसपण नाकरणारी अस्पृश्यता असो अशी अनंत उदाहरणे देता येतील. कोणी मोठा वाटा उचलला की कोणी छोटा असेल पण वाढ व घट करण्यात वाटा सर्वांचाच आहे. झालं ते झालं मात्र आता पुढचे आव्हान मोठे आहे. आपले हे जग राष्ट्रांमध्ये विभक्त असूनही आता हे एक ग्लोबल व्हिलेज होत आहे. आपण आपापल्या धर्म किंवा संस्कृतीत राहून देखील एक ग्लोबल मानव धर्म विकसित करायचा हे शक्य आहे व सर्वांच्या फायद्याचे ठरणार आहे. तंत्रज्ञानामुळे जर होमो सेपिअन्स जाऊन एखादी super human species निर्माण होणार असेल तर त्याला मानवतेची वैचारिक व भावनिक प्रगल्भता द्यायची गरज असणार आहे. ते आव्हान पेलण्याची जबाबदारी आपली च असणार आहे. मानवता च का ? फक्त माणुसकीच का? मानव म्हणून आपल्या अनेक इच्छा आहेत, त्या कदाचित एखाद्या प्राण्याच्या इच्छांपेक्षाही खूप अधिक असू शकतात. अति भूक, अति इच्छा अति हव्यास हा त्याला कधीकधी प्राण्यांपेक्षा क्रूर बनवतो. प्राणी त्यांना दररोज आवश्यक तेवढेच गोळा करतात. ते महिलांवर बलात्कार करत नाहीत. वगैरे अनेक बाबी सांगता येतील. आजचा मानव त्याच्या अगदी विरुद्ध वर्तन करतो. अधिकची बुद्धिमत्ता व भावनिकता त्याला क्रौर्या कडे लोटत आहे का ? एवढे मात्र खरे की आज जगात माणुसकी कमी होत आहे. आज सगळीकडे स्वार्थ, भेदभाव, क्रौर्य, शोषण इ. बोकाळत आहे.... तसेच दुसर्यांना त्रास देणे जोरात चालू आहे. हे मानवतेच्या विरुद्ध वर्तन जगात सर्व लोकांना दुःख देणारे व संघर्ष रक्तपात निर्माण करणारे ठरत आहे. म्हणूनच माणुसकी ची / सकारात्मकते ची जागृती झाल्याने सुख शांती यांची वाढ होईल. भले रोज एक एक कणभर च झाले तरी चालेल पण होईल तर नक्की. आपण सर्वांनी मिळून हा रथ ओढायचा आहे. मानवता हवी याचे मुख्य कारण म्हणजे तिचा अंगीकार केल्याने व्यक्ती व समाज असा दोन्हींचा संपूर्ण विकास होणार आहे. गेल्या शतकात स्त्रीवाद, दलित चळवळ, हिंदुत्व, कृष्ण वर्ण समाजाचे अधिकार इत्यादी चळवळी समाजात कार्यरत असल्याचे आपण पाहिले आहे. या चळवळी मुख्यत: एखाद्या समूहाच्या शोषणा विरुद्ध आहेत. यांचे शोषण थांबले तर ती मानवतेत भर पडेल. ते रास्त ही असेल पण जर एखाद्याला त्याच्याच परीसरातले लोक किंवा त्याचे मित्र मैत्रिणी इतकंच काय त्याचे नातेवाईक, अगदी घरातले पती / पत्नी / आई / मुलगा च छळ करत असतील तर तो काय म्हणेल ? ते बाकी सगळं ठीक आहे; पण हे तर माझ्या जाती धर्माचे च न्हवे तर माझ्याच रक्ताचे लोक आहेत; की ज्यांनी माझं जगणं मुश्किल करून सोडलंय ; यांचं काय करायचं ? आणि खरच असे खूप लोक आहेत. अशावेळी बाकी सगळे ism इथे फोल आहेत. जसा गरिबाला देव \ धर्म न्हवे तर भाकरी चा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे; तसा पीडितांना माणुसकी चा प्रश्न च फक्त रहातो. त्यामुळे आगामी 100 वर्षांसाठी मानवतेची चळवळ सर्वात आवश्यक आहे.त्यातील महत्वाचे मुद्दे कोणते आहेत? 1. लिंग, वय, जात, धर्म, आर्थिक स्थिती, राज्य, देश इत्यादी विचारात न घेता प्रत्येक मानवाशी आदराने वागले पाहिजे आणि लिंग, वय, जात, धर्म, आर्थिक स्थिती, राज्य, देश इत्यादींच्या आधारावर द्वेष करू नये. 2. इतर कोणाचेही शोषण न करता प्रामाणिकपणे स्वतःच्या कामातून तुमच्या इच्छा पूर्ण करा. 3. सर्वांसाठी प्रेम आणि कोणाचाही द्वेष नाही. 4. आनंदी राहा आणि इतरांना आनंद द्या. 5. सर्वशक्तिमान किंवा निर्माते संख्येने जास्त नाहीत : ज्याप्रमाणे सूर्याने या पृथ्वीवरील संपूर्ण जीवनाला जन्म दिला आहे आणि तो येथे सर्व मानवांच्या उपजीविकेचे अखंड कारण आहे, त्याचप्रमाणे सर्वशक्तिमान Gods अनेक नाहीत. वस्तुस्थिती अशी आहे की संबंधित धार्मिक श्रद्धेनुसार त्याला राम, अल्लाह, देव, यहोवा इ. अशी नावे देण्यात आली आहेत. त्यामुळे तुमचा देव, अल्लाह किंवा ईश्वर इतरांवर लादू नका किंवा तुमचा धर्म इतरांवर लादू नका. पुरावा येथे पहा :- विविध धर्मातील देव एकच सर्वशक्तिमान आहेत हे दर्शवणाऱ्या तुम्ही या प्रभुच्या संकल्पना पाहू शकता : हे काही संदर्भ पहा : बायबल salm 24\ 1 - पृथ्वी आणि त्यातील सर्व काही देवाचे आहे. जगात राहणारा प्रत्येकजण देवाचा आहे. ईशावास्य उपनिषद १ – ईशावास्यम् इद सर्वम् - हे संपूर्ण विश्वात जे काही आहे ते ईश्वराचे स्थान आहे. कुराण फुसिलात 2.29 – त्यानेच तुमच्यासाठी पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व निर्माण केले. मग त्याने स्वतःला स्वर्गाकडे निर्देशित केले, [ सर्व सृष्टीच्या वर त्याचे अस्तित्व आहे ], आणि त्यांना सात स्वर्ग केले, आणि तो सर्व गोष्टी जाणणारा आहे. अल्लाहने पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व निर्माण केले आहे. तो सर्वांच्या वर स्वर्गात आहे, त्याला सर्व काही माहित आहे. भगवत् गीता - अहम् सर्वस्य प्रभावो मत्त: सर्व प्रवर्तते - मी (कृष्ण) संपूर्ण जगाचा निर्माता आहे. सर्व काही माझ्यापासून उद्भवते. मला सर्व ज्ञान आहे. फक्त हे ३ धर्मातील श्लोक समजून घ्या. बाकी सगळे बाजूला ठेवा. या विधानांमधून तुम्हाला काय समजले आहे ते तुमच्या अंतरात्म्याला विचारा आणि प्रेमाने वागा. धार्मिक सौहार्द प्राप्त करण्यासाठीस विविध धर्मांचा जो ईश्वर \ अल्ला \ गॉड आहे तो वेगळे काही नसून एकच Almighty भिन्न नावाने आहे. हे प्रतिपादन मी कुराण, बायबल, गीता व विष्णु सहस्त्रनाम यांचे दाखले देत जगा समोर आणले व तशी कृती देखील माझ्या वर्तनातून केली. मूळ आधार जो almighty तो एक पण प्रत्येकाने आपल्या श्रद्धेप्रमाणे नावे भिन्न दिली आहेत. मग इतर वेगळेपणा हा गौण आहे हे देखील मी बोललो. या ज्ञानाचा योग्य अर्थ लावला तर सर्वांच्या हिताचे ठरणार आहे. म्हणून भिन्न भिन्न धर्म या केवळ वेगळ्या वेगळ्या व्यवस्था आहेत. हे त्या त्या धर्मातील विचार करणाऱ्या लोकांनी त्या व्यवस्था निर्दोष करण्याचा व वरील मुद्दा समाजाला सांगण्याचा प्रयत्न करायला हवा. माझ्या धर्मात तो मी नक्कीच केला आहे . तो प्रत्येकाने आपल्या धर्मात करावा. प्रत्येकाने आपल्या आपल्या समाजात असे मंथन घडवून आणण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे धार्मिक सौहार्द व मानवता विकसित होणार आहे. आम्ही विविध आधारावर भेदभाव करतो परंतु याचा विचार करा: जर तुम्ही एकाच कुटुंबाचा अभ्यास त्यातील सदस्यांच्या स्वभावासाठी केला तर; तुम्हाला आढळेल की एकाच घरातील सर्वजण एकसारखे नाहीत. मग आपण एखादी संपूर्ण जाती किंवा धर्म मधील सगळेच मानव समान लोक म्हणून कसे गणतो? त्यांची अनेकवचनांमध्ये गणना करू नका. प्रत्येकजण मर्यादित आणि विशेष आवृत्ती आहे. मंच म्हणून आम्हांला सर्वांना सारखे बनवण्यात रस नाही पण त्यांच्या सर्व वैविध्यपूर्ण स्वभावांसह सर्वांन्च्यात सौहार्द आणण्यात रस आहे ! ही बामनं अशिच. मरगठ्याना काय कळते. हे बौद्ध लोक कधी सुधरायचे नाहीत. मुस्लिम असे आणि हिंदू तसे ..ही सगळी वाक्ये आपण सगळ्यानी मिळुन आज आत्ता एका वेळी एकदम फ़ेकुन देवु या. कारण एखादा जरी यातून दूर राहीला तरी ती सारी वाक्ये जिवन्त रहातील. त्यामुळे विविध रंगांची आणि species ची झाडे \ फुले जशी आनंदाने एकत्र राहतात; अगदी गळ्यात गळे घालून सुद्धा रहातात. अगदी तितके नको पण किमान बरा सहवास आपण मानवही करू शकतो. मी कोणाला हिंदू व्हायला सांगत नाही, की मी कोणत्याही गैर हिंदूला जय श्री राम म्हणायला सांगत नाही. तुमचा धर्म आणि प्रार्थनेनुसार जा. मी फक्त एक गोष्ट अंगिकारण्यास सांगतो, जगा आणि जगू द्या. अशा प्रकारे जग अधिक मानव आणि राहण्यासाठी एक चांगले ठिकाण होईल. मानवतेमध्ये धर्मांची भूमिका आणि त्यांच्या मर्यादा: जगात सगळे धर्म हेच मुळी मानवतेसाठी असतात. पण जर खरे नाही उतरले तर तालिबान प्रबळ होतात आणि ख्ररे उतरले तर पृथ्वीवर स्वर्ग आणू शकतात. म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन ठरवायच्या या गोष्टी : असा हवाय पुन्हा एक सर्व धर्म संसद भरवून सर्वांनी मिळून करण्याचा एक जाहीरनामा : 1. धर्मात श्रेष्ठ कनिष्ठ असं काही दाखवायचं नसतं. माणसांच आहे तसच धर्माचं आहे - मी आणि तुम्ही समोर आलो तर काय आपण श्रेष्ठतेची स्पर्धा लावून बोलत बसायचं असत का ? 2. एकमेकांवर हल्ला पण नाही करायचा. जर तुम्ही अचानक माझ्यावर हल्ला करून आलात तर मला स्व रक्षणासाठी हात उचलावाच लागतो ना ? त्यामुळे च जगात अनेक शतके संघर्ष व रक्तपात झाला आहे. तो आता बस पुरे झाला. दुसऱ्याचा धर्म नष्ट व आपला सर्वोच्च सत्तेवर असे करणे बंद व्हावे. 3. सगळ्या धर्मांच्या लोकांनी आपल्या चूक कबूल करायच्या, माफी मागायची व त्यांना दुसऱ्यांनी माफ करायचे. | मानवतेला धक्का : धर्म मानवतेसाठी असले तरी; काही प्रवाहांमुळे खूप शोषण, रक्तपात आणि अत्याचार झाले. धर्म हे सत्य शोधण्याचे, चांगले मानव बनण्याचे, सर्वांसाठी आनंद आणण्याचे मार्ग आहेत. सर्व मार्ग एकाच ध्येयाकडे घेऊन जातात परंतु प्रत्यक्षात मात्र चुकीचे विचार आहेत की; माझा मार्ग सर्वोच्च आहे, माझा मार्गच फक्त खरा व एकमेव मार्ग आहे. त्यानंतर माझ्या मार्गावर इतरांना येण्यास भाग पाडण्याच्या कृतीने धर्माचा मूळ आधारच उद्ध्वस्त केला आहे. इतिहासात खूप रक्तपात घडवून आणला वर्तमानातही. आपली जात धर्म कुठलाही असो की समोरच्या चा जात धर्म कुठलाही असो, हे प्रेम त्यावर अवलंबून असता कामा नये कारण या संपूर्ण विश्वाचे आपण घटक आहोत हेच अंतिम सत्य आहे . जरी स्वार्थ अहंकार हे माणसाच्याच वृत्तीचे भाग असले तरी त्याला कोणी मानवता म्हणत नाही कारण ते राखून ठेवण्यासारखे भाग नाहीत उलट प्रेम व सहकार्य हे राखणे व अंगी बाणणे हे सर्वांच्याच भल्याचे असल्याने त्याला मानवता म्हणतात. या श्रुष्टीचे आपण घटक आहोत व सभोवताल च्या सर्व व्यक्ती प्राणी व वातावरण यांच्या वर च आपण सर्वजण पुर्णतः अवलंबून असतो. संपूर्ण जगतावर आपण प्रेम करावे हाच खरा धर्म आहे; त्यातच सर्वांचे हित आहे. करोंना महामारी ने देखील हेच दाखवले की सगळे एक आहेत. कितीही वेगवेगळे राहील तरी कनेक्टेड च आहेत ! नुकतेच आपण पहात आहोत की जगात चीन काय काय धुमाकूळ घालत आहे. शिवाय थोडे इतिहासात डोकावले तर आढळेल की असाच उत्पात जपानी लोकांनी केला होता. चीन वर अनेक रक्तरंजित अत्याचार केले होते च, शिवाय जागतिक दुसऱ्या महायुद्धातील सहभाग इतका की शेवट हिरोशिमावर बॉम्ब टाकून च युद्ध संपले । यात आणखी एक कॉमन मुद्दा असा आहे की चीन व जपान हे दोन्ही देश अहिंसेचा संदेश देणाऱ्या बुद्ध धर्माचा पगडा असलेले देश आहेत. याचाच अर्थ असा की धर्म कुठलाही असो; ही वर्चस्व वादि वृत्ती, अंकित करून घेण्याची वृत्ती, व्यक्तीच्या अथवा समूहाच्या स्वार्थी कांक्षा हे अगदी सर्वत्र आहे. मग पूर्व काळी युरोपिअन वसाहत वाद, अरबी साम्राज्यवाद असो किंवा हे वर्तन काय एकाच माळेचे मणी. त्यामुळेच असे वाटते की धर्म बाजूला ठेऊन आपण आपल्या सर्व धर्मातील काही उत्कृष्टतम भाग घेऊन मानवतेचा प्रसार करायला हवा आहे. ज्यात विश्व बंधुता व सर्व जग एकच असणे, तसेच सर्वांच्या सुखाची कामना शिकवली आहे. नुसता हिंदू धर्माचा प्रसार करणे आणि उरलेल्या ७ अब्ज लोकांना हिंदू करणे पेक्षा; तुमचा कुठलाही धर्म असो की तुम्ही निधर्मी असा पण तुम्ही सर्व मानवांनी ह्या ‘ तत्वधारीत मानवतेचा ' अंगीकार करावा आणि जगाच्या शांती व आनंदाचा मार्ग प्रशस्त करावा. अशी जगाला प्रार्थना करावी. मागचे सगळे विसरून एक नवे जग निर्माण करावे ही विनती आहे. अन्यथा तिसरे महायुद्ध देखील अशक्य नाही. व्यक्तीगत अथवा सामूहिक स्वार्थ सोडणे अवघड असले तरी अशक्य बिलकुल नाही. काय म्हणता ? पूर्वीच्या लोकांनी जे काही उपदेश केले त्याचे पुनर्मूल्यांकन करूया आणि ही वृत्ती बदलूया. हे ख्रिश्चन लोकांनो, जगाच्या कानाकोपऱ्यातील भूमीवर आक्रमण करणे आणि प्रजेचे सर्व प्रकारांनी धर्मांतर करणे हे मानवते चे आहे का? मुस्लिमांनो, देशात घुसखोरी करणे, त्यांना काफिर म्हणणे आणि तलवारीच्या धाकावर आणि खूप रक्त सांडणे हे मानवतेचे आहे का? कशाला धार्मिक आणि इतर शक्ती बळकावता? काय चालले आहे संपूर्ण पणे इस्लामी असलेल्या देशांमध्ये ? आहे का तिथे शांतता ? हे हिंदूंनो, एक महान तत्वज्ञान हातात असले तरी प्रचंड भ्रष्टाचार, अनुशासन हीनता अस्पृश्यता आणि जातिवाद हेच तुमच्याकडे का बरे शिल्लक आहे ? अरे कम्युनिस्टांनो, स्वतःचे रक्त मारणे आणि आपल्या ध्वजाचा रंग लाल असल्याचे सिद्ध करणे ही मानवता आहे का? नसल्यास, शक्य तितक्या लवकर स्वत: ला बदला. जगातील लोकांसाठी कोणतीही वाईट गोष्ट चांगली नाही. सध्याच्या अशांततेला या सर्व गोष्टी हे मूळ कारण आहे. वाद घालण्यापेक्षा स्वतःचा विचार करा आणि बदला. आजही स्त्रियांची स्थिती कशी आहे बघूया : माझी पुतणी सध्या DY पाटील कॉलेज ला ENT ची पोस्ट करत आहे. तिला casualty विभागात काम असते. तिने सांगितले की पतीच्या मारहाणीमुळे अनेक वेळा कान फाटलेल्या महिलांना उपचार करावे लागतात. २०१९ साली पुण्याजवळ ही अवस्था आहे. कधी आपण सुधारणार माणूस म्हणून प्रगती करणार ? आपण स्वतः चे विचार व कृती अधिक परिपक्व करणे। हा पहिला टप्पा आणि नंतर तसा विचार व कृती करण्यास इतरांना आवाहन करणे हा दुसरा टप्पा. ...नुसते मी नीट वागतो असे म्हणून नाही चालणार.. आपण हे केलं पाहिजे. नाहीतर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही. मानवता म्हणजे माणूस म्हणून परिपक्व होत जाणे आहे 2012 च्या बातम्या : आज एक बातमी आहे की एका राज्याच्या मुख्य न्यायमूर्तींनी पतीने मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करणाऱ्या महिलेची खिल्ली उडवली आहे, 'हे भारतीय महिलांचे नशीब आहे आणि तिचा नवरा कमावत असेल तर तिला त्रास का व्हावा बरं?' हे पहा एका राज्याचे मुख्य न्यायाधीश! आपण महिलांना मां दुर्गा किंवा जगदंबा सारख्या देवता मानतो पण आपल्या सभोवतालच्या सामान्य स्त्रियांचा आपण आदर करतो का, ज्यात आपली स्वत: ची पत्नी आई मुलगी देखील आहे? तुमच्या मनात असा भेदभाव किंवा अनादर असेल तर दोनदा विचार करा. आजही आपल्या स्त्रिया देखील अन्य स्त्री ला अशाच उपहासात्मक पद्धतीने वागवत आहेत. हे सर्व नव्या भारतात विचार आणि कृतीने बदलले पाहिजे. आणि त्याविरुद्ध चित्र पण दिसते ते असें - आणि याच्या नेमके उलट असेही घडते की काही स्त्रिया त्यांना संरक्षणासाठी बनवलेले कायदे पुरुष/पतींना त्रास देण्यासाठी, पैसे, संपत्ती लुटण्यासाठी स्वार्थासाठी वापरत आहेत. म्हणून आम्ही म्हणतो की स्त्री वाद हा परिपूर्ण विषय न्हवे. मानवता हा परिपूर्ण विषय आहे. आज आपल्याला असे दिसून आले आहे की नवीन टीव्ही चित्रपट आणि वेब सिरीज संस्कृती ज्यामध्ये लैंगिक, हिंसा आणि मत्सर, क्रोध, वासना आणि स्वार्थ यासारखे वाईट गुण चित्रपट, मालिका आणि जाहिरातींद्वारे प्रसारित केले जात आहेत. त्याचा मनावर आणि संपूर्ण समाजावर खूप वाईट परिणाम होत आहे; विशेषत: आपल्या तरुणांवर.त्यामुळे त्यांच्या मनावर खोल नकारात्मक परिणाम झाला आहे आणि ते वेगवेगळ्या प्रकारच्या चुकीच्या कृत्यांमध्ये गुंतले आहेत. हे सत्य यूएसए मधील तज्ञांनी देखील मान्य केले आहे. तर आपल्याला काय करायचे आहे ते म्हणजे महान लोकांचे चांगले विचार आणि आपल्या संस्कृतीतील अद्वैत तत्त्वज्ञानाच्या विशाल तत्त्वांद्वारे हे संतुलन साधण्याचा मार्ग शोधणे. तो अनंत अफाट नारायण म्हणजेच ते ' परब्रम्ह ' हे आपल्याशी योग, ध्यान किंवा वाचन अध्यात्माद्वारे जोडला गेला पाहिजे. ज्ञान हे ‘ त्याला ‘ ओळखण्यास मदत करते. आणि हेच ज्ञान आपल्याला शारीरिक इच्छांचा अतिरेक करण्यापासून स्वतःवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते आणि त्याच्या अनेक वाईट परिणामांपासून वाचवते. व्यसन विषयक विचार :- पोर्न पहाणे हे व्यसन होत आहे : त्याचा सर्वात मोठा दुष्परिणाम आपल्या मन, मस्तिष्क वर पडता आहे. एक रिसर्च : जगातील अनेक युवा पोर्न मूवी च्या व्यसनामुळे अधिक मानसिक रोगी होत आहेत, त्यामुळे समाज जीवनावर वाईट परिणाम होत आहे. दारू: छलक झलक थेंबा थेम्बा ने टपकणारि मदीरा हाक मारत आहे ? बस एक क्षण एक क्षण थांबा. जिभेवर पडताच तिचा कडवट पणा कळेल आणि आत जाताच तर आग उसळेल आणि ती तुम्हाला आतून जाळून टाकेल. त्यापेक्षा फेसाळणार्या धबाब्याकडे बघा तो तुम्हाला पूर्ण आंनद देईल. किंवा उडणार्या पक्षाकडे बघा धुंद होऊन जाल. जग इतकं सुंदर असताना आनंदासाठी ती कशाला हवी ? मित्रांनो, दु:ख विसरण्यासाठी आम्हाला कोणत्याही पेयाची गरज नाही. आपण दु:खात इतके बुडून जातो की आपला संथ श्वास आणि डोळ्यातील अश्रू कोणाच्या लक्षातही येत नाहीत. आणि मग तेच दु:ख दारूत बुडवतो तेव्हा आपण तिला पीत नाही तर ती आपल्याला पिऊ लागते. विश्वास हा मला 5 वर्ष तरी सिनियर होता. कॉलेजमध्ये प्रवेश केल्यापासून तो आमचा रोल मॉडेल बनत गेला. all rounder होता तो. काही गुंड छाप मुलांकडून; त्याचं नाटक पाडायचा प्रयत्न व्हायचा.पण तो त्याचा रोल अगदी उत्तमपणे पूर्ण करूनच दिमाखात उतरायचा. त्याचा आणि विलास चा बुद्धिबळाच्या डाव सुरू झाला की आम्ही त्यांच्या भोवती कोंडाळे करून बसायचो; एकदम पिन ड्रॉप शांतता आणि कितीतरी वेळ आम्ही बघत राहायचो । जशी हुशारी होती तसंच बोलणं पण एकदम गोड. लोकांच्या मदतीला पण तयार असायचा. आमचा या ना त्या कारणाने पुढेही तसाच संबंध टिकून राहिला. त्याने allopathy सुरू केली,बरीच प्रॅक्टिस वाढली. मी पण यथावकाश आयुर्वेदिक प्रॅक्टिस सुरु केली. मी व्यवसायात खूपच चाचपडत होतो तेव्हा त्याचे बाबा म्हणजे विश्वनाथ काका मला म्हणायचे, ‘ अरे आमचा विश्वास बघ कुठे पोचला. आधीच तू रा.स्व. संघाच्या मागे वर्ष घालवलीस आणि आता हे आयुर्वेदाचे खूळ. आई वडिलाना काय वाटत असेल ; रिटायर झालेत ना तुझे बाबा ? allopathy कर आणि बक्कळ कमाव आता. वर्ष जात होती विश्वास चं छान असणं कधीच तुटलं नाही पण कळत गेलं की कधी तरी त्याला मद्यपानाची सवय लागली होती आणि दिवसेंदिवस ती वाढत होती । ' बाहेर 'चा विश्वास तोच राहिला पण घरातला विश्वास / ' आतला ' विश्वास तुटत होता. घरी सर्वाना फार त्रास होत होता. अखेर व्हायचं तेच झालं एक चमकता तारा 100 वर्षाचं त्याचं आयुष्य 50 वर्ष च जगून निखळला. वहिनीच्या डोळ्यातला राग आणि कोरडेपणा, विसू काकांच्या चेहेर्यावरचा हताश भाव मला बघवत न्हवता. जड अंतःकरणाने मी पायऱ्या उतरू लागलो. सिगरेट मस्त कश मारत धूर सोडणार्या हिरोची तुमच्या डोक्यात फार हवा झाली आहे ? तुम्हीही त्याच style ची कॉपी करत सिगार ओढताय ? झालात मोठे हीरो ? सोडून बोला ! त्याच्यापेक्षा पांढर्या घोड्यावर मांड ठोकून मोगली सत्तेला आव्हान देणारा तो दाढीवाला हजार पटीने लई भारी हिरो आहे. [ छ. शिवाजी महाराज ] कश मारून भस्म होण्यापेक्षा त्याचे चरित्र वाचा. खूप मजा येईल राव. छाती अभिमानाने फुगेल. तिचा खोकडा होण्या ऐवजी कितीतरी भारी गोष्ट होईल. गुटका,तंबाखू : पहिल्याच क्षणी नाही म्हणा. एकदा का पहिली पुडी जिभेवर सोडली कि मग ती तुम्हाला सोडणार नाही. लवकर येणार्या शेवटाचा अंत आत्ताच करा -- नाहीतर म्हशीवाराचा मिशीवाला [ यमराज ] कधी दारावर थाप टाकेल सांगता यायचे नाही. हे सगळं तरुणांनी व्यसना पासून दूर रहावे म्हणून केलेले आवाहन आहे. यात अन्य बारकाव्याचा समावेश केला नाही. स्वतः मद्य पिणारा डॉक्टर असतो तो रुग्णाला मद्य बंदीचा सल्ला का देतो ? 1 चमचा घेताना त्याचा एकच प्याला कसा होतो आणि पुढे काहींना व्यसनाधीन करतो व त्यांचे जीवन तबाह करतो हे एक डॉक्टर म्हणून खूप जवळून पाहिलेले असते आम्ही. म्हणूनच तरुणांनी त्यापासून आधीच दूर राहणे हाच योग्य सल्ला राहील. सिगारेट चे तेच आहे हार्ट अटॅक चे ते मुख्य कारण बनते. गुटखा खाऊन मानवी प्राण्यात कॅन्सर चे प्रमाण बलवत्तर होते. म्हणून हे वर्णन अधिकाधिक लोकांपर्यंत पोचणे गरजेचे आहे. आता एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. माझे एक मित्र आहेत advocate नाईक सर. आज 31 डिसेंबर. आजचा दिवस ते थोड्या वेगळ्या पद्धतीने साजरा करतात. सकाळी त्यांचे काही मित्र हॉटेल गणराज वर येतात. मित्र येतात म्हणलं कारण वकील साहेब अगोदरच रोजच्याप्रमाणे इथे बसलेले असतात. मग सर केक कापतात आणि सर्वाना छान ब्रेकफास्ट देतात. आज त्यांचा वाढदिवस नाही पण त्यांच्या दृष्टीने पुनर्जन्म च म्हणायचा. सर तरुण वयापासून रोज 2 पाकिटे सिगारेट्स ओढायचे त्यातल्या प्रत्येक सिगारेट ला एक जुळी बहीण असायची म्हणजे लागोपाठ 2 मग pause मग थोड्या वेळाने पुनः चालू. मात्र 24 वर्षांपूर्वी या दिवशी त्यांना कुठलाही आजार वगैरे नसताना त्यांनी एकदम निर्णय घेतला की हे व्यसन सोडायचं आणि वाचनाचं व्यसन करायचं आणि कांडी जी टाकली ती आजपर्यंत हात लावला नाही. 1 तास व्यायाम झाला की ते इथल्या हॉटेल गणराज ला जातात तेव्हा त्यांच्या हातात 6 पेपर असतात. प्रत्येक बातमी वाचून झाली की पेनाने खूण करतात. सर्व पेपर व 2/3 वेळा चहा मग ते बाहेर पडून कोर्टाच्या कामांसाठी निघून जातात. व्यासंग करायचा की व्यसन हे त्यांनी ठरवलं आहे आणि तसे केले आहे. आत्महत्येचा फोल पणा : करोंना काळातील एक सत्य कथा आहे. एक व्यक्ती टेन्शन मध्ये होता. त्याला ताप खोकला झाला म्हणून करोना टेस्ट केली. पण आपली टेस्ट positive येईल व मी मरेन ही भीती आणि त्याचा ताण सांभाळू शकला नाही. त्या ताणातच त्याने आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी रीपोर्ट आला आणि त्याची टेस्ट negative आली. बातमी छोटीशीच आली पण आली होती. आज ज्या गोष्टीसाठी आत्महत्येचा विचार येतो ती गोष्ट आज भयंकर नकारात्मक असते तीच उद्या अगदी सोप्या रित्या सुटून जाऊ शकते. त्यासाठी त्याने आपला मौल्यवान जीव गमावलेला असतो. तसे होऊ द्यायचे नाही. दुसऱ्याच्या अनुभवा वरून शिकायचे. गोष्टी इतक्या लगेच नाही सुटल्या तरी सुटतात. थोडा पेशन्स ठेवा. माझ्या मना धीर धर परिस्थिती उद्या वेगळी असेल. चांगली किंवा खूप चांगली देखील असेल. कोणाशी तरी बोला. मन मोकळे करा आणि लढा. 10 मिनिटे उशीर झाला तरी जीव टांगणीला लागणारी आई किंवा बायकोचा चेहेरा आठवा. तुम्ही गेलात तर मागच्या माणसांची प्रचंड हानी होणार आहे. वास्तविक आकडेवारी पाहता, युद्धे किंवा दहशतवादी हल्ल्यांपेक्षा आत्महत्या ही जगातील सर्वात मोठे कारण ठरले आहे! त्यामुळे मानवतेला केवळ सामाजिक शांतता नाही तर आंतरिक शांतता संबोधित करणे आवश्यक आहे. ह्या दोन्ही गोष्टी घडण्यासाठी परस्पर संवाद आवश्यक आहे! गुड मॉर्निंग, नुकताच देशात दहावीचा निकाल जाहीर झाला आणि दुर्दैवाने आपल्या काही लाडक्या मुलांनी आत्महत्या करण्याचा दु:खद निर्णय घेतला आणि ती फुलं कायमची नष्ट झाली. यामध्ये केवळ अनुत्तीर्ण मुलेच नव्हे तर ९०% पेक्षा जास्त गुण मिळालेल्या मुलांचाही समावेश आहे. माझा एक मित्र आहे ज्याच्या मुलाने अशाच प्रकारे आपला जीव गमावला आणि मी पाहिले की मित्र आणि त्याच्या पत्नीची अवस्था उघड्या डोळ्याने बघवत नाही. आपला जीव देखील अस्वस्थ होतोय. त्याची आईही दीर्घकालीन नैराश्याची शिकार झाली. प्रिय मुलांनो, जर तुम्ही दहावी बारावी त असाल तर जीवन अनमोल आहे हे लक्षात ठेवा. कोणतीही स्थिती कायमची नसते. तुमच्या तात्कालीन परिस्थिती पायी तुम्ही येणारी कितीतरी मोठी उपलब्धी नाकारत आहात. असेही लोक आहेत ज्यांनी आत्महत्येचा विचार सोडून जगणे निवडले आणि नंतर लक्षात आले की आपण किती आनंद गमावणार होतो! कोणतीही विशिष्ट शाळा किंवा महाविद्यालय हे पुढील शिक्षणाचे एकमेव साधन नाही. माझे अनेक मित्र आहेत ज्यांनी अगदी सामान्य शाळेतून बाहेर पडून त्यांच्या आयुष्यात विलक्षण यश मिळवले आहे. चला तर मग ठरवूया, आयुष्य अनमोल आहे. भ्रष्टाचार पैसा खाणे : पैशाच्या लोभामुळे जगभर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. त्यापाई सर्वात जास्त नुकसान सामान्य आणि गरीबांचे होते. त्यांचा जीवन संघर्ष वाढतो. एवढे करून तो भ्रष्टाचारी माणूस तरी सुखी होते का ? तर नाही. त्याचे जीवनही उद्ध्वस्त होते अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे मानवता असे काहीतरी आवाहन करते: भ्रष्टाचार हाच शिष्टाचार बनलेल्या काळातून आपण जात आहोत. असेही युग आले आहे की जेव्हा गुंड आणि त्याचे पठ्ठे आपल्या पिढीचे हिरो बनत आहेत आणि सत्य आणि शिस्त हा विनोद बनला आहे? गैर सरकारी ठिकाणी होणाऱ्या भ्रष्टाचाराचे एक दुर्दैवी उदाहरण. वैद्यकीय सेवा आता भ्रष्ट बनत आहे. डॉक्टर रेफरल फी स्वीकारतात, कट घेतात. इतर अनेक व्यवसाय कमिशन देतात आणि घेतात .होय इतर व्यवसाय जसे की ट्रॅव्हल एजन्सी कमिशन देतात परंतु डॉक्टरांनी ते करू नये. कारण असे की या उदात्त व्यवसायाची नीतिमत्ताच वेगळ्या दर्जाची आहे. वैद्यकीय व्यवसायातील रुग्ण अशा अवस्थेत असतो की त्याला डॉक्टरांच्या आज्ञा पाळाव्या लागतात. त्यांना लॅब टेस्ट, शस्त्रक्रिया वगैरेची गरज भासत नसेल तरी डॉक्टर करायला सांगतो म्हणून करावी लागते . जर एखाद्या डॉक्टरने रेफरल फी घेतली तर तो पैशाच्या लोभापोटी अधिक रुग्णांना टेस्ट, रेडिओलॉजी किंवा हॉस्पिटलायझेशन तसेच शस्त्रक्रिया या साठी पाठवण्याची शक्यता असते आणि ती फक्त एक शुभ्र वेशतील चोरी होते आणि दुसरे काही नाही. रुग्णांना घाबरवायचे आणि डॉक्टर सांगतील तसे करायचे अशी युक्तीही अनेक डॉक्टरांकडे असते. म्हणून आपण सर्वांनी हा अंधकार नाहीसा करण्यासाठी एक पाउल टाकूया आणि दिवाळीचा दुष्ट दुर्जनांना काय इशारा आहे ते सांगून दीप प्रज्वलित करू या. दिवाळी चा स्वार्थी राजकारणी व भ्रष्ट अधिकाऱ्यांना जबरदस्त इशारा आहे की; महा प्रभावी नरकासुराचा देवी ने वध केला म्हणून नरक चतुर्दशी साजरी केली जाते. आणि रामाने देवांना देखील पुरून उरलेल्या रावणाची हत्या करून अयोध्येत आगमन केले म्हणून पाडवा साजरा केला जातो. त्यांच्या पुढे तुम्ही किरकोळ आहात रे ! भ्रष्ट राजकारणी व पैसे खाऊ अधिकाऱ्यांनो किंवा अन्य क्षेत्रातील भ्रष्ट लोकहो; लक्षात ठेवा तुम्हाला दैव कधीही सजा करू शकते. आणि हो तुम्ही इतके मस्ती करता त्याअर्थी तुम्हाला देवाची भीती नसणार च म्हणून हे ही सांगतो की हल्ली च्या काळी देखील रशियन झार, हिटलर यांना देहांत तर लालु यादव, जयललीता याना तुरुंगवास भोगावा लागला होता. अनेक लोक सांगतात की भ्रष्ट नेते व अधिकाऱ्यांना तो पैसा लाभत नाही व स्वतः व कुटुंबाला खूप त्रास होतो. ते खरे असो की नसो हिटलर व लालू मात्र खरेखुरे भ्रष्ट नाशाचे जीवंत उदाहरण आहेत. म्हणून म्हणतोय की सुधरा आणि आजच्या दिवशी शपथ घ्या की मी समाधानी राहीन व स्वच्छ कारभार करून सुखाने झोप घेईन. सेक्स : सेक्स हा शब्द मी माझ्या लेखनात काहीवेळा वापरला आहे. काही जणांना ते कदाचित तेवढं रुचत नसेल. पण मी तो शब्द वापरण्यामागे काही कारण आहे. एक तर हा शब्द न वापरता कामवासना असा शब्द अध्यात्मिक व धार्मिक ग्रंथात थोड्या व्यापक अर्थाने वापरला गेलाय. तर प्रणय क्रीडा वगैरे शब्द साहित्यात आले आहेत. पण तरुण लोकांना त्या पेक्षा हा शब्द सहज पटकन कळून जाईल हे एक आणि त्या शब्दाचा अनावश्यक tabu मोडण्यासाठी उपयोग होईल आणि तिसरे म्हणजे त्याबद्दल मोकळेपणाने शास्त्रीय व उपयोगाचे बोलले गेले तर सेक्स च्या अनेक बाजारू गोष्टींतील चूक कळेल हा उद्देश. सेक्स बद्दल आपण जी चर्चा इथे केली त्यात त्याचे सकारात्मक भाव प्रकट झाले, त्याच्या मधील धोके स्पष्ट झाले जे जिवाला उपायोगी आहेत. आणखी एक मुद्दा - Sex and the city हा चित्रपट काय किंवा अनेक इंग्रजी हिंदी मराठी सिरीज, वेब सिरीज मध्ये स्त्री मुक्ती बद्दल काही चुकीच्या गोष्टी बोलल्या गेल्यात. जसे की स्त्री स्वतंत्र होत आहे, सशक्त होत आहे आणि तिचे निर्णय ती घेत आहे, पुरुषांच्या बरोबरीने तिला स्वातंत्र्य प्राप्त होत आहे यासंबंधी किती तरी छान लेखन होऊ शकते. पण त्या ऐवजी स्त्री चा मॉड पणा हा सगळा तिच्या मद्यपान, स्मोकिंग व उन्मुक्त सेक्स मध्येच आहे अशा प्रकारे चित्रण केलेले अनेक वेळा दिसते. वस्तुतः हे करण्याचे स्वातंत्र्य तिला पुरुषाइतकेच आहे पण या गोष्टी म्हणजेच तिचे स्वातंत्र्य न्हवे. तिला निर्णयाचे, कर्तबगारीचे, बरोबरीच्या मानाचे, स्वाभिमानाचे स्वातंत्र्य हे जास्त महत्वाचे आहे. दारू सिगारेट आणि विवाह बाह्य सेक्स हे तर जाणकार लोक पुरूषांना देखील prohibited आहेत असेच सांगतात की ! सत्य कथेवर आधारित कथा : नयना हि एक अत्यंत सुंदर मुलगी आणि तितकीच स्वप्नाळू देखील. स्वप्नातला राजकुमार, त्याच्याबरोबर सुखी संसार, त्याच्या हातात हात घालून करायचा अख्ख्या जगाचा प्रवास.... अशी अनेक गोड गोड स्वप्न रंगवत असतानाच तिला चेतन भेटला. राजबिंडा चेतन म्हणजे साक्षात चैतन्यच होता. सतत उत्साहात असायचा. ओळख मैत्री व प्रेम या पायऱ्या पार पाडत ते एकमेकात पूर्ण गुंतत गेले. त्याने तिला आता लवकरच लग्न करूया असे आश्वासन दिले. नयना आश्वस्त होती. त्याच्या बाहुपाशात तिला जगाचा विसर पडला. आधी मनं आणि आता शरीरं पण जुळत गेली. आता तिला व तिच्या घरच्यांना लग्नाची घाइ होउ लागली. पण चेतनचं वागणं बदलू लागलं. तो rude होऊ लागला. हळूहळू तिला वास्तवाची जाणीव होउ लागली. एक दिवस तर कहरच झाला त्याने तिचा चार चौघात अपमान केला. थोड्याच दिवसात त्याने एकतर्फी ब्रेक अप चा एलान केला. नयना पूर्ण उद्ध्वस्त झाली. त्यातूनच तिला अवघड जागचं दुखणं झालं. डॉक्टर म्हणाले की तो एक लैंगिक आजार आहे. अशा आजारामुळे स्त्रियाच काय पण पुरूषांची देखील फसवणूक होउन जीवन खडतर झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. हे ऐकून मात्र नयना नागीणी सारखी पेटून उठली. मागचा पुढचा विचार न करता तिने पोलीस कचेरी गाठली. मुद्दामहून तिने स्त्री अधिकार्याचा हट्ट धरला. लग्नाचे अमिश दाखवून बलात्कार केल्याचे कलम लावून त्याला आत टाकला. पण सारं काही सिद्ध करणं एवढं सोपं नाहीये. नयना व कुटुंबिय सगळ्या प्रक्रियेत अगदी पिचून गेलेत. देव करो आणि तिच्या डोळ्यातलं पाणी आटून तिला खरंखुरं चैतन्य उत्साह व प्रेम मिळो. आणखी एक ताजी बातमी सांगतो की आता लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार हा आरोप पण कोर्टात दुर्बल ठरला आहे. कोर्टाने अशा केस मध्ये बलात्काराचे कलम लावण्यास नुकतीच मनाई केली आहे. सज्ञान मुलीने स्वतः होऊन शरीर संबंध केले असता त्याला बलात्कार म्हणता येत नाही असे जजमेंट आले आहे. म्हणून च मुलामुलींनी स्वत:ला कॅट्रोल करायला हवं. शिक्षण व्यवसाय नोकरी करून छानसा पार्टनर मिळवायचा आणि सुखाने वंश वाढवायचा हे उपयोगी तत्व आहे. आणखी एक मुद्दा - जोडीदाराची फसवणूक ही आणखी एक वासनाधीन आणि अमानवी गोष्ट आहे जी अनेक नातेसंबंधांना मारून टाकते. त्यानंतर अस्वास्थ्यकर संबंध निर्माण होतात ज्यामुळे त्यांच्या मुलांचेही जीवन बिघडते. याउलट एक चांगला माणूस होऊन जोडीदारशी प्रामाणिक राहिलात तर मात्र तुम्हाला खराखुरा दीर्घकाळ टिकाऊ आनंद मिळतो. आपण हे सगळ्या जगाशी बोलू इच्छित आहोत. काही गोष्टी आपण स्वत: सुरू करूया : माणुसकी नाश कशाने होतो त्या सर्व गोष्टींचा त्याग करायला हवा असे मी म्हणत आहे. त्यात स्वार्थ, पैसा, हव्यास, अहंकार सर्व काही आले. पुरुष श्रेष्ठ याला देखील छेद द्यावा व समान वागावे असे आहे. उच्च निचता नको असे आहे. दलित व कामगार यांचे शोषण ला पण विरोध करणे गरजेचे आहे. भ्रष्टाचार ला विरोध करून जे पदावर आहेत त्यांनी स्वत: तो नाकारायचा आहे. कॉर्पोरेट संस्कृती मधील काही गोष्टींना विरोध करायचा आहे; कारण त्यात अनावश्यक प्रमाणात भोगवाद वाढत असल्याने छोट्या लोकांचे व निसर्गाचे देखील शोषण होते. आक्रमण करून मोठी मोठी empires स्थापून दुसर्या देशांवर सत्ता गाजवण्याची वृत्ती पण नको हे आहे. भले ही तो विषय सामान्य माणसाचा नसेल तरी तो ती वृत्ती जोपासून दिग्गज रूलर्स वर दबाव तर आणू शकतील. मग त्यात च धार्मिक किंवा वांशिक श्रेष्ठता त्यापायी दुसऱ्या धर्मानवर आक्रमण, जबरी व फसवणुकीचे धर्मांतरण यालाही विरोधच आहे. आजकाल प्रत्येक घरात परस्पर संबंध बिघडत चालले असल्याचे दिसून येते. [ अर्थात ही प्रत्येक घराची गोष्ट असते असे नाही ] स्वार्थ आणि अहंकाराची जागा मानवता आणि संवादाने घेतली तर किती घरे वाचू शकतात. घरगुती हिंसाचार आणि विस्कळीत कुटुंबे हे समाजासमोरील मोठे आव्हान आहे. हे केवळ मानवतेनेच हाताळले जाऊ शकते. हे 7.9 बिलिअन लोकांना लागू आहे. काही गोष्टी व्यक्तींमध्ये बदल घडवून आणण्यासाठी कराव्या लागणार आहेत. तर काही समाजाच्या मानसिकतेतिल बदलासाठी असतात. त्याने सर्वांचे भले होणार आहे. एक उदाहरण पहा: 2019 मध्ये मुझफ्फरनगर यूपी येथील एका घटनेत; एका तरुणाने एका महिलेवर बलात्कार केला आणि त्या क्रूर नराधमाने तो व्हॉट्स ॲपवर पोस्ट केला. तो इतका viral झाला की परिणामी त्या लज्जित महिलेने आत्महत्या केली. किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही ? समाज मात्र पीडितेला दोष देतो. त्यामुळे तिने स्वतःचे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे समाजाने स्वत: बदलावे हेच जरूरी आहे. त्या बिचाऱ्या पीडितांची प्रतिमा डागाळू नका. पीडित महिलांना विनंती आहे की त्यांनी तुमच्याशी जे काही केले ती तुमची चूक नाही. त्याबद्दल स्वतःला लाज वाटू नये. एकूणच समाजाची मानसिकता बदलण्याचे गरज असलेले आणखी एक उदाहरण: महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत दोन वेगवेगळ्या पदवीधर वैद्यकीय व्यावसायिकांकडून स्त्री भ्रूणहत्येची दोन अत्यंत क्रूर प्रकरणे समोर आली आहेत. समाज कुठे चालला आहे? शिक्षणाचा मानवावर काय परिणाम होतो? डॉक्टर आणि त्यांच्या हॉस्पिटलमध्ये भ्रूणहत्येसाठी गेलेल्या सर्व लोकांच्या वाईट पालकां चा दोष तर आहेच आहे. पण डॉक्टर चा हव्यास हा देखील मुद्दा महत्वाचा आहे. टाळी 2 हातानी वाजते आणि एकदा कुप्रथा सुरू झाली की तीच जगराहाटी बनत जाते. लोक म्हणतात- रामायण आणि महाभारत स्त्रियांमुळेच घडले. - एकदम चुकीचे... कारण होते ते त्या माणसाची वासना आणि अहंकार. दुर्योधन दु:शासन यांची उघडी नागडी वासना हेच खरे कारण होते. स्त्रीचे तुम्ही पती, प्रियकर, मित्र किंवा भागीदार आहात, बॉस नाही आणि ती काही तुमची मालमत्ता नसून ती एक जीवंत माणूस आहे. व्यवसाय आणि कॉर्पोरेट जग - व्यापाराच्या जगासाठी ही योग्य वेळ आहे की त्यांनी मानवतेला सर्वोत्तम धोरण म्हणून स्वीकार करावे. * सर्व प्रकारचे शोषण थांबवावे. कंपनी मध्ये लैंगिक व आर्थिक शोषण होत असते ते थांबले पाहिजे. * कंपनीत employee ला दिल्या जाणाऱ्या कामाचा दबाव हा मानवी क्षमता पाहूनच ठेवला पाहिजे. दोन्ही बाजूने amicable वातावरण निर्माण करणे अवघड असेल पण अशक्य नक्कीच नाही. मार्केटिंग करताना उत्पादने विकण्यासाठी खोटी भीती निर्माण करू नये. केवळ सूट मिळते म्हणून ग्राहकांनी अनावश्यक खरेदी करू नये. मानवतेच्या आधारावर तुम्ही या आणि अशा अनेक स्व नियमांची भर घालू शकता. आणि हे चांगले लक्षात ठेवा की मानवता घेतल्याने कोणत्याही उद्योगाचा अंत होणार नाही. नोकरी करणाऱ्या सेवकांसाठी देखील माणूस असणे; ही देखील सर्वात महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक आहे. * employee ने कामचुकार पणा करू नये. प्रामाणिक व मन लाऊन केलेले काम हा एक मुद्दा आहे. या आधारावर तुम्ही देखील असेच स्व नियमांची भर घालू शकता. धर्मनिरपेक्ष राज्य किंवा धार्मिक राज्य? धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे असा देश जिथे राज्याला धर्मापासून वेगळे ठेवले जाते आणि राज्य संस्था त्यातील व्यक्तींशी त्यांच्या धार्मिक श्रद्धांच्या आधारे भेदभाव करत नाही. किंवा त्यांना पाठिंबा देत नाही. आपल्या जगाच्या नकाशावर 96 धर्मनिरपेक्ष राष्ट्रे नमूद केली गेली आहेत. काही देश इस्लामिक राज्य आहेत जो प्रामुख्याने शरियत (इस्लामिक कायदा) च्या अंमलबजावणीवर आधारित न्याय, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यावर आधारित आहे. इस्लामी राज्ये किती यांची नक्की संख्या सापडली नाही पण कदाचित 50 + आहेत. ख्रिश्चन राष्ट्रे जी आहेत ती ख्रिश्चन धर्माच्या एका प्रकाराला त्यांचा अधिकृत धर्म म्हणून मान्यता देतो तर काहीवेळा राज्य स्वत: ‘ चर्च ‘ च करत असते. जगात अशी 17 + ख्रिश्चन राज्ये आहेत. या जगात कोणतेही अधिकृत हिंदू किंवा ज्यू राज्य नाही. धार्मिक देश जगाच्या पुढे आहेत का? - जेथे धर्म पूर्ण ताकदीमध्ये आहे किंवा अधिकृतपणे धार्मिक राज्ये आहेत असे देश जर आनंदी, समृद्ध आणि शांततापूर्ण असतील तर-अफगाणिस्तान, वेटिकन शहर, इराण, पाकिस्तान, सौदी अरेबिया, मॉरिटानिया आणि येमेन, आर्मेनिया, अक्सम, जॉर्जिया तसेच रोमन साम्राज्य आणि बायझंटाईन साम्राज्य. तसे शांत व समृद्ध देश झाले असते... पण तसे दिसत नाहीत. धर्मनिरपेक्ष राज्ये तरी अशी सुखी आहेत का ? तर तसेही दिसत नाहीये. हे खरे आहे की एकतर धार्मिक राज्य किंवा धर्मनिरपेक्ष देश हे स्वत:ची प्रगती सुनिश्चित करत नाहीत. एकीकडे इराण आणि इराक वगळता कोणताही देश धर्मनिरपेक्ष राज्यातून धार्मिक राज्यात परतला नाही. याउलट गेल्या 250 वर्षांत धर्मनिरपेक्षतेकडे वाढता कल दिसून आला आहे. अनेक ख्रिस्ती राज्ये धर्मनिरपेक्ष झाली आहेत आणि त्यांनी चर्चचे पृथक्करण स्वीकारले आहे. सध्या जगात 96 धर्मनिरपेक्ष देश आहेत. जगभरातील देश धार्मिक राज्यापेक्षा धर्मनिरपेक्षतेला का निवडत आहेत? कारण - 1. सर्व लोकसंख्या निःपक्षपाती असणे गरजेचे वाटत आहे. 2. सर्व धार्मिक गटांचे सहकार्य मिळवणे सुरू आहे. 3. मूलतत्त्ववाद टाळणे साठी 4 - जगाच्या इतिहासात आपण या आधी देखील बघितले की; धार्मिक राज्यांच्या स्थापनेसाठी धार्मिक गट सर्व प्रकारच्या अमानवी कृतींचा वापर करतात. 5 – आजचे धर्म हे पुरातन काली स्थापन झाले असल्याने त्यांचे सर्व नियम तंदुरुस्त नसतात. व ते नियम धर्म राज्याच्या नावाखाली लावणे इतकेच न्हवे तर इतर धर्मियांवर लादणे हे संयुक्तिक व न्याय्य न्हवे. जगात धार्मिक युद्धांचा प्रदीर्घ इतिहास आहे, ज्यांचे कोणतेही चांगले परिणाम दिसून येत नाहीत. लाखो लोकांनी आपले प्राण गमावून अशांतता मागे सोडली आणि मानवी जीवन अस्वस्थ केले. मी माझ्या त्या मुस्लिम बांधवांना विचारतोय की , ज्यांना सर्वत्र इस्लामी राज्य हवे आहे त्यांनी सांगावे की लोकसंख्या, राज्य कायदा आणि धार्मिक वर्चस्वाच्या बाबतीत पूर्णपणे इस्लामी राज्य असण्याचा काय परिणाम होतो? अफगाणिस्तानमध्ये 99% मुस्लिम लोकसंख्या आहे, तेथील माणसाची स्थिती काय आहे? इराण इराक कुवैत सीरिया सर्व तशाच अवस्थेत आहेत. जर हा परिणाम असेल तर इस्लामी तरुणांनी इस्लामी राज्यांचा आणि इस्लामच्या प्रसाराचा विचार का करावा? फक्त अफगाणिस्तान आणि सीरियामध्ये आतंक होतो. तर सोमालियामधील कुपोषण. त्याऐवजी तुम्ही मानवतेचा विचार केला पाहिजे. जिथे एकमेकांवर आणि बाहेरील लोकांवर धार्मिक हल्ले होणार नाहीत. शिक्षण, प्रगती आणि ईश्वरी प्रार्थना हातात हात घालून खऱ्या अर्थाने अमन आणि शांती निर्माण करतील जी अल्लाहला त्याच्या मुलांसाठी हवी आहे. एकदा विचार करा आणि अनेक वेळा त्यावर कृती करा. खुदा हाफिज. बंगळुरूच्या मध्यवर्ती जामिया मशिदीच्या इमामने म्हटले आहे की इस्लामचा अर्थ मानवतेशी आहे, असहिष्णुतेशी नाही. जगभरातील कट्टरतावादी कारवायांमध्ये सहभागी न होण्याचे आवाहन त्यांनी युवकांना केले आहे. ते म्हणतात, "पवित्र कुराण आणि हदीस या इस्लामच्या शिकवणींच्या चुकीच्या व्याख्येने तरुणांना खऱ्या मार्गापासून विचलित केले आहे.आमचे पवित्र प्रोफेट मोहम्मद यांना या जगात शांततेचा संदेश पसरवण्यासाठी पाठवण्यात आले होते; अगदी युद्धातही त्यांनी आपल्या पुरुषांना निःशस्त्र आणि वृद्ध स्त्रियांना इजा न करण्याचे आदेश दिले. आजच्या काळातील या बॉम्बस्फोटांचे आणि हत्यांचे समर्थन आपण कसे करू शकतो? काल भारतीय जवानांनी एका दहशतवाद्याला जिवंत पकडले. जेव्हा मी वृत्तपत्रात अहवाल वाचत होतो, तेव्हा आतंकवादी म्हणाल्याचे नमूद केले गेले होते की : 'हे मजेदार होते, हिंदूंना मारण्यात मजा येते' हे दर्दनाक आहे, चीड आणणारे आहे. यापूर्वीही मी हजारो लोकांना याकूब मेमनला पाठिंबा देताना पाहिले होते. ही वेदना निर्माण करणारी गोष्ट आहे, पण मी लगेच दुसरा विचार केला. सर ए. पी. जे. कलाम साब हे देखील एक मुस्लिम होते, ज्यांचे हिंदूंसह सर्व भारतीयांवर प्रेम होते. मी गणेश वंदना गाणारी बेगम परवीन सुलतानाचा विचार केला आणि एकदा ती म्हणाली की 'मला माँ सरस्वतीचे आशीर्वाद आहेत' असे बरेच मुस्लिम देखील आहेत; म्हणून आपण संपूर्ण समाजाला दोष देऊ नये आणि मला वाटले की हे अधिक विच्छेदित करू नये.या सर्व दहशतवादी कृत्यांना कठोर कारवाई आणि कायद्यांद्वारे हाताळले गेले पाहिजे आणि दुसरीकडे आपण मानवतेचा विचार पसरवला पाहिजे. आम्ही येथे सर्व समुदायांच्या विशेषतः मुस्लिमांच्या तरुणांना आवाहन करतो की त्यांनी अशा कृत्यांमध्ये सहभागी होण्यापूर्वी शंभर वेळा विचार करावा. 'हे अमानवीय विचार आणि कृती तुमच्या स्वतःच्या लोकांसह जगाचा नाश करतात. सर्वांवर प्रेम करा आणि फरक पहा, आनंदाचा अनुभव घ्या. कोणी कोणाच्या श्रद्धेवर काहीही लादणार नाही परंतु प्रेम मात्र सर्वांवर करेल '. ह्युमॅनिटी अवेकनिंग फोरमने मुस्लिम युवकांना आवाहन केले आहे की, त्यांनी पुढे येऊन मुस्लिम पिढ्यांसाठी आणि संपूर्ण जगासाठी चांगले जीवन जगण्यासाठी मानवतेशी हातमिळवणी करावी. अल्लाह हा ईश्वर देव इत्यादी वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. मग द्वेष का? कुफ्र के खिलाफ जिहाद हे डोक्यातून काढून टाका. ज्याला त्याला आपल्या श्रद्धे प्रमाणे जाऊ द्या. इमान हे स्वत: संपूर्णपणे ठेवा पण दुसरींवर थोपू बिलकुल नका. सगळे एकत्र बसून ठराव करा आणि नंतर इतर धर्मियांसोबत बसून आधी जे घडले ते सर्व विसरून शांततेचे एक नवीन जग तयार करण्याचा संकल्प करा. चला आपण इतक्या मोठ्या उत्साहात मानवता आणि प्रेमाचा प्रसार करूया की उद्या जग चांगले होईल. धन्यवाद. संजूबाबा या चित्रपटाच्या यशानिमित्त - संजूबाबा या सिनेमाला भरपूर यश मिळाले अशा बातम्या वाचल्या. तो चित्रपट पहाण्याचा प्रश्नच न्हवता तरी अधिकृत प्रोमोस पाहीले आहेत त्यामुळे बोलू शकतो असे वाटते. एकंदर समाजापुढे असणारे आदर्श कोणते व समाज त्यांना त्यांच्या वाईट गोष्टीत देखील कसा साथ देतो हे सलमान खान ला दोषी ठरवलयानंतर जे घडलं त्यावरून सर्वानाच कळल होत. मग ते व्यावसायिक निर्मात्यांना का नाही कळणार ? अत्यंत लोकप्रिय अशा संजय दत्त क्या व्यक्तिगत जीवनाबद्दल लोकांना आकर्षण असणार हे कळायला त्यांना ज्योतिषाकडे जावे लागले नसणार. हा चित्रपट काढून भरपूर व्यवसाय, पैसा याचा पाऊस पडणार हे त्याने ओळखले असणार. एक न्हवे 2 निर्माते कधी न्हवत एकत्र आले आणि अपेक्षेप्रमाणे यशस्वी होत आहेत. एरवी कोण किती कमावत हे आपण कशाला बघायला जातोय ? पण हा चित्रपट पाहिलेल्या लोकांवर याचा काय परीणाम होऊ शकतो हा प्रश्न पडतो तेही तो इतक्या लोकांनी पाहिल्यामुळे. बाकी त्याच्या वडीलांनी काय केलं, कसं सपोर्ट केल, हा कसा अतिरेकी संबद्ध होता ह्यावर खूप चर्चा झाली आहे तो विषय आता नको. आपण आत्ता पाहत आहोत की व्यसने अनियंत्रित सेक्स करताना आरोग्य,मन स्वास्थ्य संबंधी नियम आहेत ते धुडकवताना लोकांचे विशेषत: तरुणांचे म्हणणे असते की ' काही होत नाही रे, मौज करो ' काहीवेळा असा रफनेस तुम्हाला रफ टफ करून देखील जाईल पण शक्यता आहे की मग त्याना संजय दत्त ने जे जे काही केलं; जसे की व्यसने, स्त्रीसेवन ते पाहून असे वाटेल की , ' बघा संजूबाबा ने हे एवढं सगळं केलं तर त्याचे काय वाईट झाले ? मस्त मजेत राहतोय. एकदम मस्त बॉडी आहे, आपण देखील मौज करू या ' आणि हा विचार जर मनात आला तर तो फार डेंजर आहे कारण एक वैद्य म्हणून मी रोज पहात आहे की या मजेमुळे किती लोक सारखे रडत आहेत. म्हणून संजूबाबा हा बिलकुल आदर्श नाही हे नीट लक्षात घ्यावे व खऱ्या स्वास्थ्याचा मार्ग शोधून आयुष्याला वळण द्यावे एवढीच विनंती. अवज्ञा - यहुदी 'हॉलिवूड' चा स्वातंत्र्याचा प्रवास प्रिय मित्रांनो, येथे हॉलीवूड चित्रपट 'अवज्ञा' 2017 चा वृत्तांत आहे. त्याची निर्मिती राचेल वाझ या ब्रिटीश अभिनेत्रीने केली आहे, जी स्वतः एक ज्यू आहे. राचेल मॅक अॅडम्स ही एक उत्कृष्ट कॅनेडियन अभिनेत्री आहे, जी तिच्या चेहऱ्यावरुन बोलणाऱ्या आणि तिने साकारलेल्या पात्रांच्या भावना व्यक्त करण्यासाठी जिला शब्दांची गरज नसते अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, तिला पाहण्यासाठी मी हा चित्रपट पाहिला. ती स्वतःवर सर्वोत्तम नियंत्रण ठेवून पात्रांमध्ये प्रवेश करते. आता मी कथेकडे वळतो-ही कथा रूढीवादी ज्यू कुटुंबात जन्मलेल्या आणि वाढलेल्या 2 मुलींबद्दल आहे ज्यांचा जवळचा संबंध आहे. वाझचे वडील दिवंगत धार्मिक नेते आणि मॅक अडमचे पती हे त्यांचे जवळचे शिष्य होते. दोन राचेलां ची लैंगिक प्रवृत्ती वेगळी आहे. वाझ बंधन उलथवून टाकते आणि मॅक अॅडम्स अनिच्छेने लग्न करते. ती म्हणते की -माझा समाज व धर्म मला लैंगिक जोडीदार निवडण्याची परवानगी देत नाही. तरी देखील अखेर जेव्हा त्या शारीरिक आणि भावनिक जवळीक साधतात तेव्हा सर्वांकडून टीका केली जाते. जेव्हा मॅक अॅडमच्या पतीचा सभास्थानातील नवीन नेता म्हणून राज्याभिषेक केला जातो, तेव्हा तो तसे करण्यास नकार देतो आणि त्याच्या गुरूचा पुनरुच्चार करतो ज्याने फ्री विलच्या आवश्यकतेचे समर्थन केले आणि मॅक अॅडम्सला त्याच्या पत्नीला सांगतो की ती मुक्त आहे... शेवट स्वतः पहा. मॅक अॅडम्स या चित्रपटाच्या महत्त्वामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत, परंतु त्यांनी एका महिलेच्या भावना अत्यंत चांगल्या प्रकारे व्यक्त केल्या आहेत.ती पुन्हा एकदा फक्त 'उत्कृष्ट' आहे. [कृपया लक्षात घ्या- हा चित्रपट प्रौढ ए certified आहे आणि त्यात दृश्ये त्यात आहेत.] हिंदू किंवा ख्रिश्चन म्हणून आपण रूढीवादी विचार आणि पद्धतींमध्ये बदल, विचारांचे स्वातंत्र्य, मानवतेच्या पार्श्वभूमीवर काळानुसार बदल पाहिले आहेत; ते येथे यहूदी धर्मात देखील पहा. बदलांची सुरुवात कधीकधी आज्ञाभंगापासून होते! आपण अमानुष रूढी व विचार त्याजले पाहिजेत. डॉ. अरुण गद्रे यांचा पेपर मध्ये खूप चांगला लेख छापून आला आहे. ते म्हणतात की आजकाल एल. जी. बी. टी. चे जसे चित्रण केले जात आहे तसे ते वैज्ञानिकदृष्ट्या नैसर्गिक नाही. ही केवळ व्यक्तीची निवड आहे. जगभरात त्याचे गौरव होणे थांबले पाहिजे. मात्र ते असेही म्हणतात की एक माणूस म्हणून, ‘ व्यक्तीच्या लैंगिक व जोडीदार 'निवडी ' चा आदर ही केला पाहिजे. मानव जागरण मंच डॉ. गद्रे यांच्याशी सहमत आहे. लेख वाचनीय आहे.' आपण सर्व त्या सर्वशक्तिमान देवाची मुले आहोत' या जर्मन चॅन्सेलरच्या शब्दांसाठी मी त्यांचे कौतुक केले. आता मी तिच्या एका ऐतिहासिक कृतीबद्दल तिचे अभिनंदन करतो. जिथे तिने तिच्या स्वतःच्या विधेयकाच्या विरोधात मतदान केले परंतु तिच्या पक्षाच्या पुरुषांना स्वतःच्या चेतनेचे पालन करण्याची परवानगी दिली आणि विधेयक मंजूर केले-जर्मनीमध्ये समलिंगी विवाह कायदेशीर केले. अशा प्रकारे तिने इतर काही युरोपीय राष्ट्रांचे अनुसरण केले. याला निश्चितच मानवतावादी पाऊल म्हटले पाहिजे. जर काहींना नैसर्गिक विचलन असेल तर त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू दिले जाईल, त्यांना इतरांच्या मार्गावर येण्याची बळजबरी करणे अयोग्य ठरेल. दुसऱ्या बाजूने पहाल तर आज पोर्न व्यसनः तांत्रिक प्रगतीच्या या आधुनिक युगात जागतिक समुदायाला वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे आणि ज्याला आपण 'प्रगती' म्हणतो - ठीक आहे आज आपण प्रगतीपथावर आहोत परंतु त्याच्याशी संबंधित धोके देखील दूर केले पाहिजेत, जसे की जेव्हा आपण औषध देतो, तेव्हा न होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल आपण जागरूक असले पाहिजे. प्रत्येकासाठी इंटरनेट सहज उपलब्ध असल्यामुळे आजकाल आपल्या लक्षात आलेली एक गोष्ट म्हणजे पोर्न बघणे जगभरात मोठ्या प्रमाणात पसरले आहे, कधीकधी हा चिंतेचा विषय असतो कारण तो अनेकांसाठी व्यसन बनला आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी लोकांना मदत आधार शोधणे आवश्यक आहे. व्यसनाधीन व्यक्तीच्या जोडीदारांनाही खूप त्रास होतो. व्यसनी जोडीदाराकडून अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतो कारण तो तसे नेट वरील त्या दुव्यांमध्ये पाहतो! विवाहेतर संबंध आणि लैंगिक संक्रमित रोग देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. पूर्वीच्या युगात मानवांचा सामान्य कल धार्मिक कार्यांकडे होता पूर्वी एखादी ब्लु फिल्म बघायची तर बराच आटापिटा करायला लागायचा. अर्थात त्यामुळे watch time मर्यादित राहायचा. निळ्या फितीच्या नेट वरील सुलभ उपलब्धतेमुळे आता त्यात प्रचंड वाढ झाली आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की 8 व्या शतकात एक महान संत म्हणून श्री शंकराचार्यांनी लोकांना मादक विचार आणि कृती न करण्याचा सल्ला दिला होता. ते म्हणतात की "अरे स्त्रीचे स्तन व मान्ड्या पाहुन व्यर्थ मोहवश का होतोस ? किती पाहून तरी समाधान होते का रे बाबा तुझे ? म्हणून अरे मुर्खा ते तर सर्व दुर्गन्ध्युक्त अशा मान्स व चरबीने भरलेले अवयव आहेत असे लक्शात घेवुन तेथुन लक्श काढुन घे व भगवन्ताचे नाम घे." त्यांना हे वास्तव कळले की भरपूर कामक्रीडा करूनही [संभोग] समाधान मिळत नाही. पण सतत अधिक लैंगिक संबंधांची इच्छा कायम राहिली. म्हणूनच त्यानेच त्यात गुंतून न राहण्याचा आणि अंतःकरणापासून देवाची उपासना करण्यास सुरुवात करण्याचा सल्ला दिला. हे तुमच्या जीवनात समतोल साधेल आणि समाधान आणि आनंदाची काही चांगली पातळी आणेल. Sex करा, अगदी उत्तम दर्जाचा करा यात काही शंका नाही. प्रणय चांगला असावा यात काही शंका नाही. चांगल्या अशा पिढीची निर्मिती व्हायला हवी आहे यात काही शंका नाही. पण आपल्याला फक्त एक संतुलन हवे आहे जे अशा प्रकारचे दुःख व्यसनातून बाहेर काढेल. मुक्तपणे वाहणाऱ्या भावना आणि विचारांवर नियंत्रण ठेवणे खूप महत्वाचे आहे. भोग इच्छा ही नैसर्गिक असते. ती जीवनात बहार आणते. जीवन नदीचा प्रवाह अखंड ठेवते ( पुनरुत्पादन ) पण नदी जर आपले पात्र सोडून वाहू लागली तर ती नैसर्गिक रहात नाही. त्याप्रमाणे हे सुख अति वाहू लागले की ह्रास होतो. हे जाणून या इच्छेला संतुलित करणे आवश्यक आहे व ईश्वर विचाराची त्यासाठी गरज आहे. म्हणून तसे स्वत:ला घडवण्याचा प्रयत्न केल्यास सर्वानाच सुखाच्या मार्गाने जाता येइल असे थोर लोक म्हणतात. एक चांगला माणूस व्हा, तुमच्या जोडीदारावर प्रेम करा, त्याच्यासोबत faithful देखील बना . आणि दुसरीकडे त्या सर्वशक्तिमानाच्या प्रेमात आणि विश्वासातही रहा. सेक्स हा शब्द मी माझ्या लेखनात काहीवेळा वापरला आहे । काही जणांना ते कदाचित तेवढं रुचत नसेल । पण मी तो शब्द वापरण्यामागे काही कारण आहे । एक तर हा शब्द न वापरता कामवासना असा शब्द अध्यात्मिक व धार्मिक ग्रंथात थोड्या व्यापक अर्थाने वापरला गेलाय तर प्रणय क्रीडा वगैरे शब्द साहित्यात आले आहेत । पण तरुण लोकांना त्या पेक्षा हा शब्द सहज पटकन कळून जाईल हे एक आणि त्या शब्दाचा अनावश्यक tabu मोडण्यासाठी उपयोग होईल आणि तिसरे म्हणजे त्याबद्दल मोकळेपणाने शास्त्रीय व उपयोगाचे बोलले गेले तर त्याबद्दल च्या केवळ गैर गोष्टींचे महत्व देखील मोडेल । सेक्स च्या अनेक बाजारू गोष्टींतील चूक कळेल हा उद्देश । सेक्स बद्दल आपण जी चर्चा इथे केली त्यात त्याचे सकारात्मक भाव प्रकट झाले, त्याच्या मधील धोके स्पष्ट झाले जे जिवाला उपायोगी आहेत. आणखी एक मुद्दा - चित्रपट काय किंवा अनेक इंग्रजी हिंदी मराठी सिरीज, वेब सिरीज मध्ये स्त्री मुक्ती बद्दल काही चुकीच्या गोष्टी बोलल्या गेल्यात । जसे की स्त्री स्वतंत्र होत आहे, सशक्त होत आहे आणि तिचे निर्णय ती घेत आहे, पुरुषांच्या बरोबरीने तिला स्वातंत्र्य प्राप्त होत आहे यासंबंधी किती तरी छान लेखन होऊ शकते । पण त्या ऐवजी स्त्री चा मॉड पणा हा सगळा तिच्या मद्यपान, स्मोकिंग व उन्मुक्त सेक्स मध्येच आहे अशा प्रकारे चित्रण केलेले अनेक वेळा दिसते । वस्तुतः हे करण्याचे स्वातंत्र्य तिला पुरुषाइतकेच आहे पण या गोष्टी म्हणजेच तिचे स्वातंत्र्य न्हवे । तिला निर्णयाचे, कर्तबगारीचे, बरोबरीच्या मानाचे, स्वाभिमानाचे स्वातंत्र्य हे जास्त महत्वाचे । दारू सिगारेट आणि विवाह बाह्य सेक्स हे तर पुरुषांना देखील recommend नाही केले जात. अश्लीलता आणि नग्नता या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अभिजात नग्नता हा भारतीय संस्कृतीसह सर्व संस्कृतींचा भाग राहिला आहे. चित्रपट निर्मितीत अभिनेता अभिनेत्रीला जर कपडे उतरवायचे नाहीत तर तुम्हाला सक्ती केली जात नाही असे असावे. पण तसे वास्तव नाहीये तिथे फसवणूक खूप आहे. ते योग्य नाही. कलात्मकता ठेवून प्रामाणिक पणे चित्रपट काढले जायला हवेत. दलितांशी व्यवहार : उत्तर प्रदेशातील सावित्री देवी ह्या गर्भवती दलित महिलेचा तोल जाऊन अंजली ठाकूरच्या बादलीला स्पर्श झाला. त्यामुळे चिडलेल्या व बुरसटलेल्या विचाराच्या अंजली व तिच्या मुलाने तिला इतके मारले की त्यात बाळ व आईचा मृत्यू झाला ! अरे कुठे चाललोय आपण ? परत जुन्या बुरसटलेल्या अमानुषतेकडे का जाताय ? विचार बदला, थोडीतरी माणुसकी ठेवा. सोडा हे हीन विचार. देव जळी स्थळी काष्ठि पाषाणी आहे तर या माणसात नसेल का ? हा मेसेज खेडोपाडी viral व्हायला हवा. आजही रोज अशा घटना आजही घडत आहेत. सोशल मीडिया व इंटरनेट ची शक्ती या चांगल्या कारणासाठी पण वापरा. विचार जागे झाले तर माणसे बदलायला वेळ लागणार नाही – काही वर्षापूर्वी गुजराथ मध्ये 2 दलितांचा खून झाला. देवळाच्या भिंतीवर बसून गरबा बघितला म्हणून त्यांना बेदम मार देण्यात आला त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुसरा प्रसंग मध्य प्रदेशात झाला ज्यात पोलिसात तक्रार केली म्हणून दलीतांचा खून केला. काय चाललंय काय ? हे एखाद्या समूहाने केलेले अमानुष कृत्य निषेधार्ह आहेच; पण शिवाय सामान्यतः मनामनात असलेली तेढ, दलितांबद्दल ची हीन भावना ह्या गोष्टी पण त्यामागे आहेत तेही बदलायला हवे आहे. कुठल्याही हत्या हृदय द्रावक व माणुसकीची हत्याच होय. पण ह्या जातीय हीन भावाने केलेल्या कृत्यां मागची भावना इतकी हीन आहे की राग येतो. खेड्यात अजून हे जास्त आहे. सैराट पाहिला आणि आठवले की tv9 वर नागराज मंजुळे यांची मुलाखत पाहिली होती. त्याच्या त्या वक्तव्याने मनात काहूर निर्माण केले. तो म्हणाला की, ‘ लोक सैराटच्या गाण्यात च अडकले त्याचाच आनंद जास्त घेत आहेत. पण ज्या कथेत दलित हीरो ला वागवतात व अखेर हत्या होतात त्या सिनेमातल्या परश्या व अर्चिचा शोकात्म शेवट त्यांना अस्वस्थ करतो का ? तर हो फक्त काही अंशी च हो. मित्रांनो व मैत्रिणिनो हा सिनेमा आहे. त्यातले प्रत्येक दृश्य हे दिग्दर्शकाने नियंत्रित केलेले व अभिनेत्यांनी त्याने सांगितल्याप्रमाणे फ़क्त अभिनय केलेला असतो. लोक अशा आभासी घटनांनी काहीकाळ अस्वस्थ होतात. पण प्रत्यक्ष झालेल्या घटनांनी तेव्हढे होत नाहीत हे चूक आहे. आज देखील कितीतरी so called honor killing च्या नावाखाली किती हत्या होतात ? हा विचार कोणाही सुजाण माणसांना विचार करायला लावणारा आहे हे नक्की. माझ्या महितीतले असे दोन honor killings एक कोल्हापुरजवळ व एक साताऱ्यात काही महिन्यांपूर्वी घडले आहेत. विशेष म्हणजे कोल्हापुरातील घटनेत 'पाटील व कुलकर्णी' होते तर साताऱ्याच्या घटनेत 'मराठा / माळी' असा रंग होता. यात पहिल्या घटनेत दोघे मारले गेले व दुसऱ्या घटनेत स्वतः मुलीच्या वडिलांनी पळून जाऊन लग्न केलेल्या मुलीला माहेरी नेतो असे म्हणून नेले व क्रुरपणे तिला मारले ! सांगायला वाईट वाटते की सदर मुलगी गर्भवती होती पण तिच्या नीच, अधमाहून अधम बापाला तिची अजिबात दया आली नाही. वर्तमानपत्रात बातमी आली, त्या नराधम बापाला अटक झाली. आता काय परिस्थिति आहे हे पोलिसांना माहिती ( तो नराधम कदाचित जामीनावर सुटला पण असेल) त्यानिमित्ताने काही प्रश्न माझ्या मनात उभे राहिले – 1. देशाची घटना व संसदेने केलेले कायदे सर्वोच्च आहेत की नाहीत? 2. सर्वांना ते लागु आहेत की नाहीत ? 3. सज्ञान मुलगा व सज्ञान मुलगी यांना स्व मर्जी ने विवाहा चा पूर्ण हक्क आहे की नाही? 4. प्रेमविवाहास विरोध असणे मी समजू शकतो पण एकदा विवाह केल्यावर त्यांचा जीव कोणीही का व कसा घेऊ शकते? 5. टोकाचा विरोध असेल तर आई वडिलांनी त्यांना घरातून सुसंस्कृतपणे बाहेर काढावे पण अपमान, अवहेलना, व मारहाण का? 6. ते आता मोठे आहेत सज्ञान आहेत त्यांना इतरांचे वाईट न करता जसे योग्य वाटेल तसे जीवन जगण्याचा त्यांना हक्क आहे हे मान्य आहे का? 7. एखादी निवड चुकली असेल तर नीट समजाउन सांगणे योग्य की त्यांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांना विरोध करणे योग्य? मानवते बद्दल विचार करतांना आपण सगळे च जण म्हणजे - मी लेखक व तुम्ही वाचक आपण ग्रे शेड मध्ये आहोत असे म्हणता येईल. म्हणजे आपण चुकतो पण अगदी रावण देखील नाही. पण आपल्या अवती भोवती चे काही लोक मात्र चांगलेच villain म्हणजे कैकेयी किंवा रावण बनलेत ....आणि ते कोणी परके नाहीत तर नातलग वगैरेच आहेत. त्यांच्या वागण्याने त्यांच्या घरातील व्यक्ती च पीडित आहेत. अगदी वनवास भोगावा लागतोय. त्यावर उपाय शोधायचा म्हणून त्यांच्याशी बोलताना मी म्हणलं की आपले हे मानवतेचे मेसेज पाठवा वाचायला द्या व आवाहन करा. किंवा आपण त्यांच्याशी बोलुया ; तर ते पीडित लोक असे म्हणाले की त्या रावण कैकेयी माणसात काही च फरक पडणार नाहीये ! माणुसकी जागी होणार नाहीये ! अरेरे मग हा आपले मानवतेचे सगळे प्रयत्न व्यर्थ च होतील का ? नाही नाही. जर आपण सर्वांनी जोरदार सकारात्मकता ठेवली तर चांगल्या गोष्टी निश्चितपणे घडू शकतात. येथे सांगितलेले शेकडो शब्द बाजूला ठेवा आणि फक्त याचा विचार करा. जेव्हा लोक जगातील मानवी वर्तनावरील विश्वास गमावतात. त्यांना वाटते की आजूबाजूला फार कमी मानवता शिल्लक आहे. आम्ही ठामपणे सांगतो की, 'आपण स्वतःपासून सुरुवात करूया आणि ते जगभरात जागृत करूया. आणि ते पुन्हा बहरेल हे शक्य आहे. अवघड असले तरी अशक्य नाही. करू शकू आपण; कारण हे कळले पाहिजे की शोषण करून अथवा सत्ता गाजवून जे मिळते त्यातून सुख प्राप्त होत नाही, उलट सम्राट सिकंदर निराश झाला, हिटलर ने आत्महत्या केली, जग लूटून श्रीमंत झालेले पाश्चात्य जग आज सुखी नाही. या सगळ्यातून आपण काहीतरी शिकायला हवे ना ? महान कलियुग आला आहे, त्यामुळे काहीही होऊ शकत नाही ? - जेव्हा मित्रांकडून मानवते च्या पोस्ट वर प्रतिक्रिया येते, तेव्हा काही मित्र म्हणतात की एक भयानक कलियुग आहे, त्यामुळे काहीही होणार नाही. .. पण माझा अभ्यास वेगळेच सुचवतो. मानवी वर्तनाकडे पाहिल्यास, ऐतिहासिक काळापासून हिंसाचाराचा मोठा परिणाम झाला आहे. रोमन, युरोपियन, अरबी साम्राज्यवाद, सेमिटिक युद्ध ही काही उदाहरणे आहेत. याशिवाय, फ्रान्स आणि इंग्लंडसारखी सतत चालणारी युद्धे किंवा अशोकाची कलिंग युद्धे देखील पूर्वी झाली. या सर्वांमध्ये, स्वतःचे राज्य किंवा धर्म स्थापन करण्याचा हेतू प्रबळ होता. जेव्हा आपण युद्ध म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ हिंसा, बलात्कार, शोषण, हत्या असा होतो. या संदर्भात गेल्या 70 वर्षांत आम्ही निश्चितपणे पुढे गेलो आहोत. असे इतरही काही मुद्दे आहेत ज्यांबाबत मनुष्य सुधारत आहेत. महिलांप्रती समान दृष्टिकोन, गुलामगिरीचे उच्चाटन, लोकशाहीची स्थापना, अंधविश्वासाला विरोध, अस्पृश्यता निर्मूलन इत्यादींच्या रूपात आपण अधिक चांगले मनुष्य बनलो आहोत. नाही ना? इंडोनेशियातील बहुसंख्य मुस्लिम अल्लाहसह भगवान रामावर विश्वास ठेवतात. भारताचे उस्ताद मोईनुद्दीन डागर स्वतःच्या विवेकाने गणेश वंदना गात असत. पंडित जसराज जी हे गीत 'मेरी अल्लाह मेहरबान "त्याच भावपूर्ण भावनेने गातात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, अल्लाहला आपल्या 33 कोटी देवी-देवतांशी जोडण्यात आम्हाला कोणतीही अडचण नाही. मी माझ्या मुस्लिम ख्रिश्चन जैन बंधू आणि भगिनींचे 'असल्लम आलेकुम' किंवा 'गॉड इज ग्रेट' किंवा 'नमो अरिहंतनम' ने स्वागत करतो. ही उदाहरणे लक्षात घेऊन सर्व हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन इत्यादी. स्वतःच्या धर्माचे पालन केले पाहिजे, इतरांचा आदर केला पाहिजे, इतर सर्व गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजेत आणि जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तर जग पुढे जाईल आणि हे उदाहरण जगात शांततेचे वातावरण निर्माण करेल. आपण ते मनापासून करू शकतो का? होय, मला वाटते की आपण हे करू शकता. इसरार अन्सारी जमशेद नदाफ नसीम शेख से अल्लाह मलिक है म्हणा आणि ते माझे जय गणेशाने स्वागत करतात, जिमित शाह मनोज फिरोदिया अर्चना फिरोदिया सुनील कटारिया से जय जिनेंद्र म्हणतात आणि ते माझे श्रीरामाने स्वागत करतात, रवी वाघमारे, अविनाश वाघमारे से बुद्धम शरणम गच्छामी म्हणतात आणि ते जय मातादिये म्हणतात. आणि पुन्हा नव्याने सुरुवात करणार का? ।। धार्मिक सौहार्द प्राप्त करण्यासाठी स ईश्वर धर्मांचा जो ईश्वर अल्ला गॉड आहे तो वेगळे काही नसून एकच almighty भिन्न नावाने आहे हे प्रतिपादन मी कुराण बायबल v विष्णु सहस्त्रनाम यांचे दाखले देत जागा समोर आणले व तशी कृती देखील माझ्या वर्तनातून केली. मूळ आधार जो almighty तो एकच असल्याने बाकी भेद हे गौण आहेत हे देखील मी बोललो. त्यामुळे भिन्न धर्म या व्यवस्था मात्र आहेत. त्या त्या धर्मातील विचार करणाऱ्या लोकांनी त्या व्यवस्था निर्दोष करण्याचा व वरील मुद्दा समाजाला सांगण्याचा प्रयत्न करायला हवा व तो मी नक्कीच केला आहे . मुस्लीम बांधवांनी विचार करण्यासारखी गोष्ट ही की - मुस्लिम सत्यशोधक चळवळ सारख्या काही क्षीण चळवळी देशात चालल्या व काळाच्या ओघात नष्ट देखील झाल्या. बाकी सगळा बोलबाला तर ओवैसी सारख्या हिंदू द्वेश्ट्या मंडळींचा आहे. त्यामुळे नुकसान मुसलमानांचे तर होत आहेच पण हा प्रश्न केवळ मुस्लिम समाजाचा नसून संपूर्ण देशाचा आहे. देशातील शांततेचा आणि सौहार्दा चा आहे. हिंदू व ख्रिश्चन समाजानी जशी विज्ञानाची व आधुनिकतेची कास धरली, सामाजिक चळवळींचा उपयोग करून मूलगामी व मानवतावादी बदल घडवले तसे मुस्लिमांनी केले नाही हे दुर्दैव म्हणायचे. त्यांचे तुला काय करायचे आहे ? हे तुम्ही मला म्हणणार नाही ही अपेक्षा आहे कारण या चुकीच्या विचारांवरील निष्ठेमुळे देशाचे च न्हवे तार संपूर्ण जगाचे नुकसान होताना दिसत आहे. त्यांना बदला असे आवाहन मी या कळकळी पोटी केले. त्यावर काही मुस्लिम युवकांनी पाठींबा देखील दर्शवला. बाकी काहींनी विद्वेष युक्त नारे देत माझा मुद्दा उडवून लावला पण मी मुद्दा मांडला. जेव्हा मोदी सरकारने triple तलाक चां मुद्दा काढला तेव्हा एका मुस्लिम सामाजिक कार्यकर्तीने पुढे येऊन त्याला पाठींबा दिला. ही तिने चांगली सुरुवात केली आहे. त्याबद्दल तिचे अभिनंदन व शुभेछा. बेल्जियम मधे ब्रुसेल्स शहरात मुख्य चौकात एक फार छान शिल्प आहे. ते जगभरातल्या टुरीस्टचं आकर्षण आहे. त्याचा प्रभाव इतका ते शिल्प त्या शहरातल्या सर्व प्रवासी लोकासाठी USP आहे.. तो आहे एक ६० सेंमि उंचीचा ब्रॉंझचा पुतळा पूर्ण नग्न बालक जो सतत उभा राहून शू करत आहे. कारंजे टेक्नॉलोजिने तो सतत मुत्रा ठेवलाय. ...अहो गोष्ट तर खरी पुढेच आहे. तो जगातल्या शांतीचा खरा प्रेरक ठरू शकतो. जेंव्हा अशांतता, रक्तपात चालू होता तेंव्हा खेळता खेळता त्या निरागस गोड बाळाला शू शू लागली आणि तो कडेला जाउन बिंधास्त रस्त्यातच सू करायला लागला. आणि त्याच्या माय बापाच्या अंगाचा थरकाप झाला कारण त्याच्या समोर बॉंब होता! त्यांनी धावत त्याला मागे ओढलं. अॅंटी बॉंब स्क्वाड आला आणि बघतात तर काय बॉंब डिफ्यूज झाला होता. ....जर प्रत्येक बॉब ठेवणार्या डोळ्याला त्याचं स्वत:च असं बागडणार, सूसू करणारं बाळ दिसलं तर ? अतिरेकी लोकांनी आपल्या मुलांच्या भवितव्याची नक्कीच चिंता करायला हवी नाही का ? हिंदू समाजाने पण सौहार्द टिकवून ठेवत “ सबका साथ सबका विश्वास “ ही मोदींची अपेक्षा पूर्ण केली पाहिजे. यातच सर्वांचे भले आहे. यातच शांतता व आर्थिक प्रगतीचे बीज देखील आहे. कष्ट, प्रामाणिकता व माणुसकीने राहिलो तर आपण सगळेच समृद्ध व सुखी होऊ. प्रत्यक्षात घडतं काय हे आपण आधी बघू - मी गेल्या 40 वर्षांपासून सामाजिक व आध्यात्मिक संस्थांशी निगडित आहे. पाहिलं ते असं की एवढे अध्यात्मिक किंवा सोशल वर्क करणारे लोक सुद्धा इतके भयानक वागतात ! काय उपयोग या सगळ्याचा ? मग ' 1 बोट समोर दाखवताना 4 आपल्याकडे वळलेली असतात ' या न्यायाने विचार केला की आपण स्वत: काही उत्तम पुरुष नाही ! आणि वाचलं कि उत्तम पुरुष वा स्त्री पण चुकतात. मग यातून नकारात्मक न होता असं वाटलं की; अध्यात्म / समाजसेवा करावी न करावी; पण आपण सगळ्यांनी एक एक पाऊल प्रगती करत जास्त चांगलं वागावं, एक एक कण आणखी चांगला / ली माणूस व्हावं. हेच सर्वात जास्त गरजेचं आहे. *शोध सत्याचा* एक रविवार असा येतो की तुम्ही अगदी आनंदाच्या अत्युच्च शिखरावर असता, मग दुसरा रविवार असा येतो की तुम्हाला त्या सुखाच्या मर्यादा लक्षात येतात आणि म्हणून तुम्ही उपभोगाच्या मर्यादा जाणून घ्यायला लागता आणि मग एक रविवार असा येतो की तुम्ही मग ' *सत्य ' काय ते शोधायला लागता । असा मस्त सूर्योदय बघितला, चहा चे घोट घेऊन झाले, पूर्वीचे आनंदाचे क्षण आठवून झाले आणि मी टेरेस वर टाकलेल्या माझ्या सतरंजी वर पाठ टेकवली आणि वर बघतोय तर काय निळेशार आकाश. आधीच्या आनंदापेक्षा काही वेगळाच फील माझ्या हृदयाकाशाला व्यापून टाकतोय असं जाणवलं. माणसाचा देव आधी सूर्य, अग्नी, वरूण वगैरे होता आणि मग गिरी शिखरावर ध्यानस्थ बसलेल्या ऋषी मुनींचे लक्ष त्या अफाट पसरलेल्या आकाशा कडे गेलं आणि त्यांना खरं परब्रम्ह सापडलं असणार आहे. ह्या आकाशाचा ठाव लागत नाही, समुद्राची उपमा त्याला बसत नाही कारण विराट सागराला देखील मर्यादा असतात. वर खाली मागे पुढे इकडे तिकडे नुसतं आकाश च आकाश हे अनंत अफाट आहे. मग मला आठवलं ते ताई आणि मेहुण्यां सोबत नेहरू सेंटर ला planitorium ला गेलो असताना त्या खगोल शास्त्रज्ञाने उच्चारलेले पाहिले वाक्य ' या शास्त्राचा अभ्यास करू लागलात, आकाश पाहु लागलात की लक्षात येतं की अरे आपण च काय पण आपली अवघी पृथ्वी देखील किती छोट्टुली आहे. उगीच आपण आपले अहंकार व स्व महत्व किती कुरवाळत आहोत ? ' ऋषींच्या अहंकाराची पहिली पाकळी पण अशीच ह्या शास्त्रज्ञा प्रमाणे गळून पडली असेल ? हे आकाश इतकं विराट अफाट, त्याला ना आदी ना अंत, त्याचा ठाव लागत नाही, ना ते जन्माला येते ना मरते, ना त्याला कोणी जाळून टाकू शकते, ना त्याला कोणी मारू शकते, सगळ्या विश्वाला व्यापून टाकते, त्याच्या पोटात च हे सारे जग सामावले आहे, त्यातच सारे काही अगदी सूर्य चंद्र तारे सारे काही जन्मले आहे आणि त्यातच सगळे विलीन होणार आहे. ते कधी बदलत नाही; क्षणिक वादळे आणि ढग येतात जातात त्याला काही फरक पडत नाही. ते असते नित्य, स्थिर. आणि त्यामुळेच एका न सपंणार्या आंनदाची निर्मिती होत राहाते. मग यातून त्यांना त्या परब्रम्ह जे आकाशाला ही व्यापून असते त्याची अनुभूती झाली असेल आणि हे सारे गुण अथवा त्याही पलिकडे निर्गुण असे सनातन परब्रम्ह की जे अनादी, अनंत, अजन्मा व नित्य शाश्वत परब्रम्ह उमजत गेले असेल. हे सतत चैतन्यशील आहे, ह्यातून होणारा आनंद संपत नाही आणि हेच काय ते सत्य आहे याची जाणीव त्यांना झाली असेल । आपले जग मोठे भासत असले तरी त्या ऋषीला आणि ह्या शास्त्रज्ञाला हे कळले असेल की ते tends to zero आहे. म्हणूनच या ऋषींनी या जगाला माया असे म्हणले एक नुसता पाण्यावरचा बुडबुडा. मग तो ऋषी पुन्हा आपल्या आश्रमात येतो, पुन्हा दोन वेळच्या खाण्याची सोय, पत्नी आणि मुलांचा जिव्हाळा वगैरे रोजचे वास्तव त्यात गुंतणे आणि पुन्हा पर्वत शिखरावर जाणे, सत्याचा अनुभव मग पुन्हा खाली. अविरत फिरणारे चक्र चालूच ! यालाच जन्म मृत्यू चा फेरा म्हणता येईल. जेव्हा वर खाली कुठेही असताना त्या ईश्वराचे ठिकाणी बुद्धी स्थिर होईल तेव्हाची अवस्था जणू काही देह प्रपंचाचा दास सुखे करो काम अशी होऊन जाते. शरीर आपले काम करेल इंद्रिये त्यांचे ते भोग घेतील पण मी म्हणजे तोच आहे तो अफाट विराट नारायण अशी भावना कायम झाली की तोच मोक्ष आणि तीच काय ती मुक्ती ! पण ते तितके सोपे नाही. एक दिवस त्याचा देह जीर्ण विशिर्न होतो, चटई वर अंतिम क्षण मोजताना तो सुखाने देह सोडण्याची तयारी करतो । अंतिम सत्याचे दर्शन घेत त्याला देह सोडायचा आहे पण सूर्य देव आडवा येतो म्हणजे अत्यंत छोटे का होईना आकर्षण शिल्लक असेल का ? तो मुनी म्हणतो हे सुर्या तुझ्या सोनेरी हिरन्मय पात्राने माझ्या सत्याचे मुख झाकलं जातं आहे ते पात्र जरा दूर कर । मला ' त्या ' चं दर्शन घेऊ दे । '' हिरणमयेन पात्रेन सत्यस्य अपहितं मुखम तत् त्व पुशन अपावरूणू *सत्य* धर्मस्य दृष्टये ।। '' त्या मुक्ता साठी सूर्य नारायण देखील क्षण भर बाजूला होतो सत्य नारायणाचे दर्शन होते आणि ह्याचा प्राण त्याच्यात विलीन होतो । एका जीवाचे आवर्तन सत्य समजल्याने पूर्ण होऊन जाते ।। नारायण सर्व इति ।।। वरील अध्यात्म थोडक्यात सांगितले कारण एक चांगला माणूस बनण्याचा हा एक मार्ग आहे. तुमचं वेगळ असेल तर ते धर्म वा अध्यात्म तुमच्या माणुसकीच्या प्रवासा साठी तुम्ही निवडू शकता या संपूर्ण माणुसकीच्या विचारांचे फायदे : एक चांगला माणूस असणे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी खूप फायदेशीर आहे. जे स्वार्थी आहेत, शोषक आहेत, क्रूर आहेत, सत्तेचे भुकेले आहेत, अधिक शक्तीशाली आहेत - त्यांना त्यांच्या कृत्यांमधून भरपूर पैसे आणि शक्ती मिळू शकते. परंतु ते कधीही समाधानी होत नाहीत. ते आयुष्यातील अनेक आनंद गमावतात. मला माझ्या कौटुंबिक संबंध सल्लागार असलेल्या पत्नीकडून कळते; ती एक ज्योतिषी आहे ; अनेक श्रीमंत जोडपी नाखुश असतात कारण दोघेही किंवा त्यांच्यापैकी एक व्यक्ती स्वार्थी किंवा अहंकारी असते ती इतरांवर वर्चस्व गाजवणारी असते. ते आयुष्यातील खूप आनंद गमावतात, ते बहुतेक वेळा दुःखी असतात. जर मानवता तत्व स्वीकारले आणि चांगले आचरण केले, तर ते त्यांना जीवनातील अशा दुःखापासून रोखू शकेल. त्यांचे जीवन समाधानाने परिपूर्ण होईल. परवा शिंदे सर आले होते. ते MSEB तून निवृत्त झाले. त्यांनी कधीही 5 पैसे देखील लाच घेतली नाही; स्वच्छ राहिले. पत्नी दीर्घ आजाराची पेशंट आहे तिची स्वतः सेवा करतात आणि समाधानानाने रहातात. त्यांनी सांगितलं की, ‘ आयुष्यात भरपूर लाचखोर इंजिनीअर व अधिकारी पाहिले. पण त्यातले फार थोडे आयुष्यात यशस्वी झाले. सहज पैसा आला की व्यसनाधीन होणे , बाह्य स्त्री सुख इत्यादीमुळे आरोग्य आणि कौटुंबिक स्वस्थता दोन्हीचा मोठा ह्रास त्यांच्या वाट्याला येतो. पत्नीची गळचेपी व मुलांकडे दुर्लक्ष होऊन त्यात आणखी भर पडते . पुन्हा फार निर्ढावलेला नसेल तर डोक्यावर सतत सापडले जाण्याची भीती रूपी टांगती तलवार असते ती वेगळीच. पोचवा हे धोके विविध अस्थापनातील नोकरदारांपर्यंत. स्वच्छ कारभार - आनंदी समाधानी कारभार ! होऊ द्या सुरू एक नवा अध्याय आपल्या भारतीय नोकरशाहीत. Is it possible ? बदल हा जगाचा नियम आहे. जर मी बदलू शकलो तर संपूर्ण जग बदलू शकेल. मानव युगानुयुगे बदलत आला आहे, म्हणून उद्या तो निश्चितच एक चांगला माणूस बनू शकतो. दक्षिण अमेरिकेत मेक्सिको देश आहे. तिथे आस्तेक नावाचे लोक मूलनिवासी आहेत. त्यांची संस्कृती व धर्म खूप प्रभावी होता. आजही कॅथोलिक असले तरी त्यांना त्या मूळ संस्कृती चा अभिमान आहे. त्यांच्यावर धर्माचा प्रचंड पगडा होता. इजिप्त च्या तोडीच्या पिरॅमिड मधील त्यांच्या सूर्य मंदिरातून धर्मगुरू च्या देखरेखीखाली शिक्षण दिले जात असे. हे आस्तेक लोक फार चिवट आणि लढवय्ये असत. त्यांच्यात लढाया चालत आणि शत्रूच्या सैनिकाला जिवंत पकडणे हे शोर्याचे प्रतीक मानत असत. पण अशा काही परंपरा होत्या ज्यात पकडून आणलेल्या कैद्याला घरी ठेऊन खाऊ पिऊ घातले जायचे. आणि अत्यंत क्रूर पद्धतीने मोठ्या समारंभाने देवळात त्याचा बळी दिला जायचा. इतकेच काय पण त्याचे मांस देखील मालकाच्या वाट्याला यायचे व तो ते नर मांस खात असे! काय उपयोग त्या धर्म, मंदिर व शोर्य असण्याचा ? नंतर गेल्या 500 वर्षांपूर्वी स्पॅनिश आक्रमण व विजयानंतर हे सगळे थांबले. आता धर्म कॅथोलिक व अभिमान आस्तेक आहे. स्पॅनिश लोक पण काय साधे होते काय ? तर नाही - त्यांनी अनेक अमानुष पद्धती वापरून विजय मिळवला होता. अशी ही भयानक माणसे पुढे बदलली व आज 2025 मध्ये बघाल तर तिथली स्थिती खूप वेगळी आहे. देश सर्व दृष्ट्या पुढे यायचा प्रयत्न करतो आहे. त्यांचे जे लोक USA मध्ये घुसतात ते बिहारी लोकांसारखे कष्टाचे काम करतात व अत्यंत कष्टाळू व नेटके प्रामाणिक पणे काम करतात. कुठल्याही कुप्रथा आता शिल्लक नाहीत. स्पॅनिश व आस्तेक एकमेकांना मानव सुद्धा मानत नसत तसे आता राहिले नाही. माणसं बदलतात हे नक्की मॅक्सिको ने ते सिद्ध केले आहे. माणुसकी संपत चालल्ये व स्थापित होणार नाही असे मानणार्या बंधू भगिनीनि ही कथा जरूर लक्षात ठेवण्यासारखी आहे. आता उरलेल्या लोकांची पाळी आहे. आपण एक पणती तेवत ठेवायची. बाकी क्रमशः होतच रहाणार आहे. स्वामी विवेकानंदजी म्हणतातः धर्म ही एक कल्पना आहे जी पाशवी वृत्ती ला माणुसकी पर्यंत आणि मनुष्याला देवापर्यंत प्रगत करवते .विचार करण्याची शक्ती हाच मनुष्य आणि यंत्र यांच्यातील फरक आहे. धर्म एका क्रूर विचाराला समाप्त करेल आणि अशा प्रकारे त्याचे रूपांतर माणूस म्हणून करेल. अशा प्रकारे बहुतेक दुष्ट व्यक्ती स्वतःला केवळ एक माणूस म्हणून नव्हे तर संत म्हणून देखील बदलू शकते. भारतातील सर्वात जास्त वाचलेले पवित्र पुस्तक रामायण लिहिणाऱ्या वाल्मिकी रुशी बनलेल्या वाल्या कोलीच्या बाबतीतही असेच घडले होते. वाल्याकोली जो एक क्रूर दरोडेखोर होता तो महान वाल्मिकी ऋषी बनला. कोणत्याही क्रूर व्यक्तीच्या बाबतीत असे घडू शकते. मात्र धर्म नीट वापरला तरच हे होऊ शकते अन्यथा प्रचंड नरसंहार देखील धर्मांच्या नावावर च झालेत. धर्मातील वर्चस्व वाद जगाला अंकित करण्याच्या वेडगळ कल्पना सोडून द्यायच्या आहेत. अंगुलीमाल हा एक भयानक राक्षस होता. पण असं काही घडलं की तो देखील एक महान पुण्यात्मा बनला. त्याच्यात बदल घडवणाऱ्या गौतम बुद्धांना विचारलं की हा पुण्यवान कसा काय झाला ? तर ते म्हणाले, " हा पाप आणि पुण्य चा प्रश्न नाहीये. हा शक्तीच्या परिवर्तनाचा प्रश्न आहे. " तसे होणे हे अशक्य नाही. हे मुंगेरीलाल चे हसीन स्वप्न नव्हे. थोरा मोठ्यांनी हा आशावाद जपला आहे. जसे की ज्ञानेश्वर माऊली प्रार्थना करतात : ‘ जे खळांची व्यंकटी सांडो. ‘ 1292 साली माऊली ( संत ज्ञानेश्वर ) ने देवाकडे हे पसायदान मागितलं होतं. की जे दुष्ट आहेत त्यांचा दुष्टावा नाहीसा होऊ दे. शिवाय त्यांनी सगळ्या माणसांतला चांगुलपणा आणि सद्भाव जागा करण्यासाठी अथक प्रयत्न देखील केले. आपण देखील तो वसा पुढे चालवायचा. माघार नाही. कारण विषय त्या काळा पुरता नाहीये. आजच्या दिवशी देखील असलेल्या प्रचंड गरजेचा आहे. आपण आत्ताच करणार का स्वतः मध्ये हे परिवर्तन ? की काही तरी भयंकर घडल्यावरच जागे होणार ? थोडा आतला आवाज तर ऐका. एकदा आपण सर्वांनी एक चांगला माणूस बनण्याची शपथ घेतली की आपण अनुसरण करण्याचे विविध मार्ग शोधू शकतो जसे की . १ आपल्या आईवडिलांनी बालपणात आपल्याला अनेक गोष्टी कठीण केल्या आहेत; ज्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत, त्यावर विचार केला पाहिजे आणि त्यावर कृती केली पाहिजे. २ वृत्तपत्र, कथा, कादंबरी किंवा चरित्र किंवा आध्यात्मिकता असे अनेक प्रकारचे दर्जेदार साहित्य वाचून त्यावर विचार करा आणि त्यावर कृती करा. ३ आपल्या आवडीनुसार खऱ्या अध्यात्माशी करा. ४ उत्तम अभिरुचि चे संगीत, चांगले चित्रपट पाहणे ५ . क्रीडाप्रकाराच्या भावनेने खेळ. ६ निसर्गात शांत आणि शांत राहण्यासाठी बाहेर जाणे. ७ .Thanking मानवतेच्या मार्गावर चालण्यासाठी आम्हाला मदत करण्यासाठी महान लेखक , संगीतकार, गुरु, नेते यांना धन्यवाद देणे. ८ सर्वात महत्त्वाचे म्हणजेः प्रत्येक कृतीपूर्वी मानवतेच्या कसोटीवर घासून घेणे. हे नुसतं जप, तप, नमाज वा sunday prayer ने होणार नाही. तर प्रत्येक क्षणी प्रत्येक कृती तपासून तसे वागले तर होईल. माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे; तसेच दुसऱ्याला समजून घेणे आणि शक्य असेल तर मदत करणे - निदान दुसऱ्याची निंदा नालस्ती न करणे. कोणाचेही अहित न करणे. मानवाने मानवासाठी जपलेली संवेदना. सा-या विश्वावर प्रेम करणे, थोडेसे प्रेम, थोडी आपूलकि,थोडी काळजी, विचारपुस, सवेंदनाशील रहाणे व वागणे. आपल्याशी इतरांनी जसा व्यवहार ठेवावा असं वाटतं तसा आपण स्वतः दुसऱ्या प्रत्येकाशी व्यवहार ठेवणे. शांती ,दया व समभाव, तसंच इतरांच्या स्वातंत्र्याचा अधिकार मानणे. त्यांचा माणूस म्हणून स्वीकार करणे. दुसऱ्याचे दुःख जाणून त्याची मजा न उडवता उलट त्याला यथाशक्ती सहकार्य करणे. नुसती मदतच करत न रहाता पुढचे म्हणजे त्याला स्वतःच्या पायावर उभे करणे. ‘ खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ‘ इति श्री. साने गुरुजी या श्रुष्टीचे आपण घटक आहोत व सभोवताल वर च आपण पुर्णतः अवलंबून असतो. त्यामुळे संपूर्ण जगतावर आपण प्रेम करावे हाच खरा धर्म आहे; त्यातच सर्वांचे हित आहे. आपली जात, धर्म कुठलाही असो की समोरच्या चा जात धर्म कुठलाही असो, हे प्रेम त्यावर अवलंबून असता कामा नये. संपूर्ण विश्वाचे आपण घटक आहोत हे अंतिम सत्य आहे. दुष्ट व्यक्ती असेल तर त्याच्या कुकर्माचा हिशोब न्यायाने करावा व त्यास शासन द्यावे हे मानवतेच्या विरोधी मात्र खचितच नाही. हे देखील येथे नमूद करणे देखील योग्यच आहे. जरी स्वार्थ अहंकार हे माणसाच्याच वृत्तीचे भाग असले तरी त्याला कोणी मानवता म्हणत नाही. ते राखून ठेवण्यासारखे भाग नाहीत. उलट प्रेम व सहकार्य हे राखणे व अंगी बाणणे हे सर्वांच्याच भल्याचे असल्याने त्याला मानवता म्हणतात. अशा सर्व लोकांवरील प्रेमाने जगातील सौहार्द वाढेल त्याने जग शांत व समृद्ध होईल. लोकांसाठी लोकांद्वारे केलेली चांगली वागणुक व समानता म्हणजे मानवता. जेव्हा आपण स्वतःला बदलण्यास स्वीकारतो आणि तसे करण्यास सुरुवात करतो; तेव्हा आपल्याला त्या मार्गावर पुढे जाण्यासाठी सतत प्रोत्साहन देण्याची गरज असते. म्हणून आपण मानवता जागृती मंच हा एक छोटासा प्रेरक संघ बनवला आहे ; जो विचारपूर्वक जगण्याचे आवाहन करतो. जो आपल्या बालपणापासून आपण शिकत असलेल्या सर्व सु संस्कारा नुसार आपल्या प्रत्येक कृतीचे आवाहन करतो. बऱ्याच वेळा असे घडते की; आपण त्यानुसार जगणे विसरतो किंवा मार्ग सोडणे निवडतो. यामुळे शॉर्टकट यश मिळवण्यास मदत होऊ शकते; परंतु आजीवन आनंदासाठी नाही. हे सगळे 1 किंवा 2 व्यक्ती बदलण्यासाठी झाले तर ते पुरेसे नाही. इच्छित परिणाम मिळविण्यासाठी ते जगभरात पसरवणे आवश्यक आहे. अन्यथा ते व्यर्थ आहे. ही एक चळवळ झाली तर उपयोग आहे. हे मानवतेचे वगैरे सगळं तुम्हाला का सांगतोय ? तुम्ही तर एवढी गोड माणसं आहात, सर्वांशी छान वागता मग का ? कारण एक अशी दुर्दम्य आशा आहे की; तुम्हाला पटलं आणि तुम्ही वायरल केलं तर एखादा माणूस सुधारेल एखादा समाज बदलेल एखादं युद्ध सुद्धा वाचेल एखादी निर्भया बलात्कार न होता सुरक्षित घरी जाईल, एखादी कोरेगाव ची दंगल वाचेल, एखाद्या आजीचे नातवाकडून घेतले जाणारे प्राण वाचतील, एखादी मुख्तार माई सामूहिक अत्याचारापासून वाचेल, एखादा युवक दलीत आहे म्हणून किंवा उच्च जातीतील मुलीशी विवाह केला म्हणून मारला जाणार नाही... असं बरंच काही होऊ शकते. आणि दुसरं म्हणजे तुम्ही सगळी छान माणसं असलात तरी व्यक्ती परत्वे ५१ ते ९९ टक्के चांगली आहात. आपल्याला सर्वांना ४९ ते १ टक्का सुधारायला वाव आहे. माझ्यासाठी ४९ तर टक्के तर कोणाला फक्त १ टक्का संधी आहे ती घ्यायलाच हवी आहे. एक मित्र म्हणाला की आर प्रसाद, मानवतेच्या मेसेजेस चा भडिमार होतोय. म्हणलं बरोबर आहे पण हे विचार म्हणजे काही हॉट केक किंवा हॉट लेडी नाहीयेत त्याच्यावर लोकांच्या उड्या पडायला. जिची एक ही फिल्म माहिती नाही त्या साक्षी मलिक चे 68 लाख फॉलोवर्स आहेत आणि आपले 68 दशकं ( ६८० ). म्हणूनच ह्या विचार बिया सतत टाकत रहावे लागते. भौतिक शास्त्रांमध्ये खूप सारे नवे नवे असते. पुस्तकच्या पुस्तक भरली तरी नवीन असते. तसे अध्यात्म किंवा मानवता यात खूप नवीन लिहायला काही नसते. पण ते अंगी मुरवायला मात्र फार वेळ लागतो म्हणून पुनरोक्ती करत राहावे लागते. जशी भारतात सव्वाशे कोटी जनतेत हिंदुत्वाचे वातावरण आहे तसे जगात सातशे नव्वद कोटी लोकांच्यात मानवतेचे वातावरण निर्माण करू या. जर एवढ्या लोकांनी मानवतेची शपथ घेतली तर जगाचे चित्र वेगळे दिसेल मित्र मैत्रिणींनो । आमच्या फोरमबद्दल थोडे सांगतो : मानव जागरण मंच म्हणजे काय? या नावा वरूनच स्पष्टपणे समजेल की हे सर्व मानव, पुरुष महिला वृद्ध मुले आणि तरुण जागृत करण्याचे एक माध्यम आहे. हे तृतीय पंथीयांना देखील जागृत करेल. जागे करायला सगळे लोक झोपलेत का ? तर नाही. असे नाही की सगळे झोपले आहेत, पण असे बरेच असतील. महान भारतीय संत कबीरा म्हणाले की 'सर्व झोपले आहेत, मी तरी कोणा कोणाला जागे करू? ' जरी त्यांनी असे म्हटले असले तरी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दोहा नावाच्या त्यांच्या कवितेद्वारे लोकांना जागृत करण्यासाठी समर्पित केले.संत कबीर किंवा हा मंच असे का म्हणतो की लोक झोपले आहेत ? जरी जग अनेक प्रकारे समृद्ध होत असले तरी जग अजूनही दुःखात आहे, आजूबाजूला अशांतता निर्माण करणाऱ्या दुष्कृत्यांना ते पाहते. दहशतवादाच्या आहे, अमेरिकेत अनियंत्रित गोळीबार होतात. भारतातील मागासवर्गीय लोकांच्या घर पेटवली जात आहेत, जगभरात बलात्कार किंवा भ्रष्टाचार होतच आहेत. तर ही काही उदाहरणे आहेत की लोक चांगल्या माणसासारख्या गोष्टी करत नाही. कोणीतरी म्हणू शकेल; "आम्ही, सामान्य लोक हे करत नाही आहोत, आम्ही फक्त पीडित आहोत. हे सर्व आम्हाला का सांगत आहात? माझे उत्तर आहे; "जर आपण बारकाईने पाहिले तर आपल्याला दिसेल की सामान्य माणूस देखील बरीच चुकीची कामे करत आहे. कदाचित आपल्या चुकीच्या विचारांमुळे, स्वार्थी हेतूंमुळे आणि अनियंत्रित मनामुळे. एक सामान्य माणूस लिंग, जाती धर्म, रंग इत्यादींच्या आधारे सूक्ष्म पातळीवरील द्वेष निर्माण करण्यासाठी भेदभाव करतो, डॉक्टर गैरप्रकार करतात, विद्यार्थ्यांनी त्यांच्या खाजगी वर्गात यावे या स्वार्थी हेतूने शिक्षक नीट शिकवत नाहीत, दूधवाला दुधात पाणी घालतो, सिग्नल लाल असताना लोक रस्ता ओलांडतात, कौटुंबिक हिंसाचार आणि हत्या चालूच आहेत. हा फोरम माणसाला जागे होण्यास आणि त्याच्या स्वतःच्या प्रत्येक कृतीकडे लक्ष ठेवण्यास आणि एक चांगला माणूस होण्यासाठी स्वतःला दुरुस्त करण्यास सांगते. आम्ही हे स्वीकारतो की वाईट गुण देखील मनुष्याचा स्वभाव आहे परंतु हे वाईट गुण तुमच्या स्वतःच्या आणि इतरांच्या जीवनासाठी दुःख निर्माण करतात; म्हणून आपण स्वतःचा आढावा घेतला पाहिजे आणि स्वतःला सुधारले पाहिजे जेणेकरून आपल्या मधील माणसे जागी व उत्तम तयार होतील. माझ्यासाठी आणि माझ्या समुदायासाठी आणि आजूबाजूच्या जगासाठी आनंद शोधण्याचा हा एक सर्वोत्तम मार्ग आहे. काही उदाहरणे पहाः जर एखाद्याला एखाद्या मुली बद्दल लैंगिक वासना असेल आणि ती नकार देत असेल तर तो तिच्यावर बलात्कार करू शकतो किंवा लिंचिंग करून तिला आणि तिच्या कुटुंबाला त्रास देऊ शकतो. पण जेव्हा तो कायद्याच्या हाती पकडला जातो तेव्हा त्याला शिक्षा होते आणि त्यामुळे कर्त्याचा स्वतःचा नाशही होतो. एकतर त्याला फाशी दिली जाते किंवा तुरुंगात टाकले जाते. जर कोणी पत्नीला काही महत्त्व देत नसेल, तर तिला मारहाण करत असेल , तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध ठेवत असेल तर काय घडते? ती अस्वस्थ रहाणार आणि जरी त्याचा अहंकार तृप्त झाला असला तरी देखील प्रत्यक्षात तो कौटुंबिक सलोखा गमावतो आणि ही गोष्ट त्याच्यासाठी दुःख निर्माण करते. त्या आर्थिकदृष्ट्या भ्रष्ट लोकांनाही कायद्याने शिक्षा होण्याची शक्यता आहे. किंवा कायद्यापासून वाचला तरी सर्वशक्तिमान शक्ति कडून शिक्षा होऊच शकते. आज जग दहशतवादामुळे खूप रक्तपात होताना पाहत आहे, खूप दहशत निर्माण करत आहे, कधी धर्माच्या नावाखाली देखील. तुम्ही तुमचा धर्म बळजबरीने किंवा राजकीय सत्ता इतरांवर लादू नये. ते अमानवी आहे आणि तुमच्या स्वतःच्या लोकांसाठीही दुःख निर्माण करते. अफगाणिस्तानी नागरिकाचे दु:ख आज सगळे जग पहात आहे ना ? आपल्याला जगासाठी आनंद आणि शांतीचे एक नवीन जग निर्माण करण्याची गरज आहे. त्यामुळे मंच जागतिक स्तरावरही मोठ्या बदलाचे आवाहन करतो. भूतकाळात खालील काही प्रकारच्या आक्रमणांमुळे जगाने खूप वेदना पाहिल्या आहेत. माझ्या देशा सारख्या अनेक देशांना खूप त्रास झाला आहे. या आमनौष वृत्ती चा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम आजही पूर्णपणे नष्ट झालेला नाही. अतिशक्ती किंवा विस्तारवाद किंवा शोषण करण्याची मानसिकता पूर्णपणे काढून टाकली जात नाही. मग ते पैशासाठी असो, सत्तेसाठी असो किंवा धर्माच्या विस्तारासाठी असो. त्या आक्रमणकर्त्यांनी त्याबद्दल माफी मागितली पाहिजे आणि ती मानसिकता चांगल्यासाठी सोडली पाहिजे. तसे केल्यास त्यांना माफ करणे ही आवश्यक आहे. केवळ आंतरराष्ट्रीय मंचांवरील भाषणांमुळे काम होणार नाही. दोन्ही बाजूंच्या लोकांनी-विशेषतः तरुणांनी एकत्र येऊन त्यासाठी शपथ घेण्याची गरज आहे. पण दुर्दैवाने असा संवाद कुठल्याही आंतरराष्ट्रीय मंचांवरही दिसत नाही. मंचाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यासाठीची तयारी जाहीर करण्यासाठी आम्ही आज येथे आलो आहोत. काही जमिनीवरील कामे मानव जागरण मंच \ एम. जे. एम. ने केली आहेत. मानव जागरण मंच म्हणून आम्ही सर्वसमावेशकतेवर विश्वास ठेवतो. आम्ही एक संस्कृती एक धर्मावर विश्वास ठेवत नाही, तर सर्व संस्कृती आणि धर्मांमधील सुसंवादावर विश्वास ठेवतो. आम्हाला प्रशासनासाठी मानवतेचे राज्य हवे आहे, हा काळ सर्वांसाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकासासाठी आहे यावर आपण विश्वास ठेवतो. सर्वांसाठी प्रेम हा केवळ एक शब्द नाही तर आमच्या सदस्यांसाठी मनापासूनची भावना आहे. अर्थात, आम्ही जातीच्या किंवा धर्माच्या आधारावर कोणाच्याही विरोधात किंवा द्वेष करत नाही. काही जाती किंवा धर्मातील काही चुकीचे लोक मानवतेविरुद्ध वर्तन चुकीचे असू शकते, त्यांना आवश्यकतेनुसार वागणूक दिली जाऊ शकते, मग ती प्रेमाने असो किंवा कायद्याद्वारे किंवा योग्य संस्थेद्वारे कठोर शिक्षा. असे हिटलर, मुशर्रफ रावण बाबर आणि दुर्योधन सर्वत्र आहेत, त्याचप्रमाणे बाबा आमटे, मार्टिन लुथर किंग आणि ए. पी. जे. अब्दुल कलामदेखील सर्वत्र आहेत. मानव जागरण मंच ने सन २००० पासून पुणे शहरात काम सुरू केले. त्यात जमिनीवर काम करणाऱ्या 15 सदस्यांची ताकद होती. ज्यात अधिकतर तरुणांचा समावेश होता. त्याने खालील कामे केलीः 1. राणा प्रताप उद्यानात नियमितपणे दुर्बल जागृती सभा. 2. हिराबागजवळच्या झोपडपट्टीत 56 शाळकरी मुलांना चांगल्या पुस्तकांचे वाटप 3. एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या मुलींच्या हत्यांविरोधात अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयात 50 विद्यार्थ्यांसह आमचे मित्र डॉ. भंडारे यांच्यासमवेत जागृती कार्यक्रम! 4. रक्षाबंधनाच्या निमित्ताने सरस्वती मंदिर आणि आदर्श विद्यालयात 113 आणि 250 विद्यार्थ्यांसह जागृती कार्यक्रम. 5. अकरा मारुती चौक आणि सेवा मित्र मंडळात दहशतवादाचा विरोध करण्यासाठी आणि काश्मिरी विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी जाहीर सभा. 6. नवी दिल्लीतील संसद भवनवरील हल्ल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान अटलजींच्या शब्दांनुसार कारवाई करण्याची मागणी करणारी स्वाक्षरी मोहीम इ. सन 2002 मध्ये केली. 7. भ्रष्टाचार, दहशतवाद आणि दरवाढ यांच्याविरुद्ध शुकरवार पेठ पुणे येथे 2010 साली सभा. 8. जागृत करणाऱ्या लेखनाचे पॅम्पलेट्सचे वितरण केले नंतर आणि आता चालू असलेले प्रोगग्राम. त्यानंतर आम्ही एप्रिल 2007 मध्ये शिवानंद प्रबोध मंडळाची सुरुवात केली, ज्याने रमजानवमी, गुरुपौर्णिमा आणि शिवरात्रीसह धार्मिक क्षेत्रात अनेक कार्यक्रम आयोजित केले. 9. ती दर आठवड्याला मोफत योग शिबिरे आणि आध्यात्मिक वाचन आयोजित करत असे. त्यात तरुण आणि मध्यमवयीन मित्रांसह 10 व्यक्ती सहभागी होत होत्या. 10. नंतर आम्ही जागरण पत्रके आणि गरीब आणि वृद्ध लोकांसाठी मोफत आरोग्यसेवा सुरू केली. 11 .....आज आपण आपले विचार संपूर्ण जगभरात अंतरजाल इंटरनेट च्या माध्यमातून पसरवत आहोत. सर्व भाषिक बंधु भगिनिपर्यंत हा विषय पोचत आहे. सर्व जाती धर्म वंश देशीय लोकांपर्यंत ही पोचत आहे. पिक्चर तो अभी बाकी आहे. [ काम अजून बाकी आहे. ] 
15 वर्षातील मानवता लेखांचे संकलन : प्रत्येक संचाचे 3 भाषेतील भाषांतर अशा 4 files तयार झाल्या आहेत. 39 पाने / 16 हजार शब्द सर्व भाषा मिळून तर 44 पाने / 13 ह. मराठी चे 36 पाने / 15 ह. हिंदी चे 32 पाने / 14 ह. इंग्रजी चे असे तयार आहेत.
               धन्यवाद, आपला; 
        डॉ. प्रसाद फाटक, मानव जागरण मंच पुणे, भारत, विश्व. .

Comments

Popular posts from this blog

herpes treated fast by ayurveda: herpes zoster. PHN or pain after herpes. Herpes simplex well treated. genital herpes.

Psoriasis and ayurveda. eczema ayurveda twacha rog ayurveda.

Dr Prasad phatak treats Nagin ya herpes by Ayurveda very fast