Posts

Showing posts with the label मराठी

मानवतेची महागाथा. 29 Humanity Thoughts in Marathi. Complete and unabridged.

Image
                   मानवतेची महागाथा          मला उमजलेली मानवता आपल्यासमोर मांडत आहे. हे माझ्या अल्प बुद्धी ला सुचलेले विचार आहेत. आपण यावर विचार करा व पटेल तेव्हढे स्वीकारा व पसरावा. जे पटले नाही ते सोडून द्या. सर्वांचे सर्व मुद्यांवर संपूर्ण एकमत कधी होत नसते. नवरा बायको आई मुलगा यांचे देखील होत नसते. इतरांची तर काय कथा ? हे विचार कसे व कुठून आले त्याची पूर्व पिठीका : मी खूप वेळा बोलत असतो, तशी माझी दोन मने देखील कधी कधी आपसात बोलत असतात ! असाच एक संवाद प्रकट करतोय. मन १ व मन २ अशी सोप्पी नावे देतोय त्यांना. ...  मन १ - तुला आठवतं का ?  मन २ - काय रे ?   मन १ - बरोबर ४६ वर्ष झाली तू एका बाईंच्या अन्यायाची तक्रार घेऊन शाळेचे सुपरवायझर श्री. कुलकर्णी सरांकडे गेलास तेव्हा ते काय म्हणाले ?  मन २ - आठवतंय की. ते म्हणाले की तुझी तक्रार नंतर सांग. पण आधी तू काय आहेस ते बघ ? तू काय तुकारामाचा अवतार लागून गेलास काय ? ...

सर्वांसाठी सुखाचा एक मार्ग.

Image
आपल्याला जर सुखी व्हायचे असेल तर दोन गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे.  1. 🕉 अद्वैत तत्त्वज्ञान : परब्रम्ह हे सर्व एकच आहे ते पाचही महाभुतांना व्यापून दशांगुळे उरले आहे असे म्हणतात. म्हणजेच ते सगळ्या यूनिवर्स पेक्षा जास्त काही व्यापून आहे.  त्यामुळे पांच महाभुते किंवा ज्याला भौतिक जग म्हणतात किंवा हे सगळे आपण प्राणी, वनस्पती, दगड, धोंडे, आकाश, सूर्य, तारे 🐯🐋🌞🍎🍔  वगैरे ते सर्व काही परब्रम्हाचा च भाग आहे.   दोन असे काहीही मानत नाहीत ती मनाची बुद्धीची स्थिती अत्यंत अवघड आहे.  म्हणून दुसरे आहे -  २.🌍 द्वैत तत्त्वज्ञान : त्यात भौतिक जग व परब्रम्ह असे दोन स्वतंत्र भाग मानले जातात.  जीवनातील सुखासंबंधी बोलायचे झाले तर  १. 🔯 या पाच महाभूतांची गरज नसलेले आपले आपण मिळणारे सुख किंवा त्यालाच शून्यातील सुख किंवा परब्रम्हाचे सुख.  २. 🍇 शरीरासंबंधीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे पंचमहाभूते यांचे भौतिक सुख.   असे दोन भाग होतात. 🍓 आपण जेवढे भौतिक सुखात लिप्त होऊ तेवढ्याच दुःखांचा देखील सामना करावा लागू शकतो तसेच त्या सुखाला...

उन्हाळा आला महाबळेश्वर ला चला

Image
Repost.  Read if you missed it and *re read if you read it.*  It is soul soothing kind one : उन्हाळा आला की मुलांना शाळेच्या सुट्ट्या लागायच्या म्हणून आपली ट्रिप देखील उन्हाळ्यातच करायची आपल्याला सवय होऊन गेली. टूर्स अँड ट्रॅव्हल्स चां हा काळ. त्यातून पुणे मुंबई नागपूर सारखे ठिकाणा गर्मीने हाहाकार मग काय चला महाबळेश्वर पाचगणी असही असायचं. असाच एक रम्य अनुभव : ( निबंध format ) *तुका म्हणे होय मनासी संवाद* -  ट्रिपचा नुसता विषय निघाला तरी सगळेजण आनंदित होऊन जातात. मरगळलेले लोक देखील उत्साहाने बोलू लागतात. त्यातून उन्हाळा असेल तर जीवाची काहिली झाल्याने शहरा बाहेर पडण्याची देखील तीव्र इच्छा असतेच. मग जवळच्या जवळ म्हणून महाबळेश्वर-पाचगणी किंवा जमलं तर उटी मनाली अशा अनेक ट्रीप्स आपल्या निघतात. मला आणि माझ्या कुटुंबाला देखील अशा सहलींचे भारी आवड. सहलीला गेलं की मन कसं प्रसन्न होऊन जातं. या सहली मधील अनेक अनुभव सगळी मित्रमंडळी मैत्रिणी लिहितीलच. ते वातावरण अनेक जणांच्या लिहिण्यात येईल दिवसभर ठीक ठिकाणी विशेष पॉईंट्स असतात तिथली गर्दी पाहता हा सर्वांचा आवडीचा विषय कसा आहे हेही कळू...