Posts

Showing posts with the label विचार

मानवता सर्वप्रथम विचार मंथन भाग ~2

Image
ईश्वर, धर्म, कर्म - ये सब  मनुष्य को बेहतर इंसान बनाने के उद्देश्य से हैं ।  मानवता के विरुद्ध सभी कामों का त्याग कर देना चाहिए। देव, धर्म, कर्म हे सर्व काही  माणसाने अधिक चांगला माणूस बनणे  यासाठी आहे.  माणुसकी विरुद्ध असणारी  सारी कामं छाटून टाकायची.

समविचारी सेलिब्रिटी.

Image
● प्रियजन हो, यातला जो पहिला फोटो आहे तो मंचाचा विचार थोडक्यात मांडणार्या पॅम्प्लेट चा आहे.  ● दुसरा जो आहे तो बराक ओबामा च्या नव्या पुस्तकाच्या प्रिफेस मध्ये व्यक्त केलेला विचार आहे. ● ओबामा असे म्हणतो की, आता जग छोटे झाले आहे त्याच्या पुढील समस्या अफाट आहेत. आपण एकमेकांच्या संपर्कात येणारच आहोत; तर आपण सगळ्यांनी एकत्र राहण्यास व एकमेकांचा सन्मान करण्यास शिकले पाहिजे. अन्यथा आपण नष्ट होऊ.

हिंदुत्वाचे वारे की वावटळ?

Image
हिंदुत्वाचे वारे की वावटळ? ■ हिंदू धर्मावरती अनेक आक्रमणे झाली, त्यातून हिंदूंचे धर्म परिवर्तन झाले, त्यांच्यावर अत्याचार झाले म्हणून आजहि हिंदूधर्म टिकवण्याची गरज आहे - याबद्दल दुमत नाही. एक चांगले वारे म्हणजे धर्म टिकवण्याचे वारे वाहणे केव्हाही चांगलेच.  ● परंतु अशा काही गोष्टी घडतात तेव्हा त्याला वावटळीचे स्वरूप आल्यासारखे वाटते. योग्य अयोग्य ठरवण्याचे क्षमता संपली की अशा घटना घडतात. असे वातावरण निर्माण होते. आणि ते योग्य नव्हे. बिल्किस बानू व जुनेदच्यावेळी देखील आम्ही तसेच म्हटले होते. ● फोटो १ ~ हा जो एक्सप्रेस चा लेखक आहे तो असे म्हणतो की; त्याचा मुलगा मुसलमान असल्यामुळे त्याला कसाबचा रोल मिळतो, मुले त्याला पाकिस्तानी व पहेलगाम वाला असे म्हणून निंदा करतात, ट्रोल करतात! ही गोष्ट नक्कीच गंभीर आहे. ● वाऱ्या मधून चांगली ऊर्जा निर्माण होते पण त्याचे वावटळ झाले की विध्वंस होतो. याचे भान हिंदू समाजाने ठेवायला हवे. हिंदुत्वाचे, हा धर्म टिकवण्याचे श्रेय प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जाते म्हणून त्यांच्याबद्दल विचार करणे येथे आवश्यक आहे....

तिघांचा आशिर्वाद.

Image
माझ्या क्लिनिकच्या वेटिंग रूम मध्ये कायम वास्तव्य असलेले तीन.... माऊलीच्या अलीकडे पलीकडे काहीही ज्ञान नाही.... तुकोबाच्या भक्ती ला जगात तोड नाही.... आणि सर्व धर्मांचे मूळ स्थान म्हणजे फक्त माणुसकी... ✴️ माणुसकी सर्व धर्मांच्या वर आहे. मानवतेमुळेच धर्म निर्माण झाले. कसे ते पहा: ■ सुरुवातीच्या काळात आपण प्राण्यांसारखे जगत होतो. मग आपल्या मेंदू, भावना आणि विचारांमुळे आपण वाढू लागलो. आपण चांगले मानव व्हावे अशी आमची इच्छा होती. दुसरा कोणताही प्राणी एक चांगला कुत्रा किंवा चांगली चिमणी होण्याचा विचार करत नाही! याउलट स्वार्थी हेतूंमुळे कधी कधी आपण प्राण्यांपेक्षाही वाईट बनतो. या दोन्ही कारणांसाठी देखील मानवतेच्या विचारांची च गरज आहे. ■ वेगवेगळ्या संस्कृतींनी आणि वेगवेगळ्या धर्मांनी लोकांना चांगले मानव बनवण्याचे काम हाती घेतले. यावरून प्रथम काय आहे ते स्पष्टपणे दिसतेच आहे! काही धर्म उत्कृष्ट असू शकतात आणि काही त्या कामामध्ये उत्कृष्ट नसतीलही. पण उद्देश तोच आहे. ■ उलट पक्षी असे ही घडते आहे की धर्मात काही चुकीच्या गोष्टी, प्रथा देखील आहेत. त्या नीट कराव्या लागतील.  मानवता हा असा आधार आहे की ज...

मानवतेची महागाथा. 29 Humanity Thoughts in Marathi. Complete and unabridged.

Image
                   मानवतेची महागाथा          मला उमजलेली मानवता आपल्यासमोर मांडत आहे. हे माझ्या अल्प बुद्धी ला सुचलेले विचार आहेत. आपण यावर विचार करा व पटेल तेव्हढे स्वीकारा व पसरावा. जे पटले नाही ते सोडून द्या. सर्वांचे सर्व मुद्यांवर संपूर्ण एकमत कधी होत नसते. नवरा बायको आई मुलगा यांचे देखील होत नसते. इतरांची तर काय कथा ? हे विचार कसे व कुठून आले त्याची पूर्व पिठीका : मी खूप वेळा बोलत असतो, तशी माझी दोन मने देखील कधी कधी आपसात बोलत असतात ! असाच एक संवाद प्रकट करतोय. मन १ व मन २ अशी सोप्पी नावे देतोय त्यांना. ...  मन १ - तुला आठवतं का ?  मन २ - काय रे ?   मन १ - बरोबर ४६ वर्ष झाली तू एका बाईंच्या अन्यायाची तक्रार घेऊन शाळेचे सुपरवायझर श्री. कुलकर्णी सरांकडे गेलास तेव्हा ते काय म्हणाले ?  मन २ - आठवतंय की. ते म्हणाले की तुझी तक्रार नंतर सांग. पण आधी तू काय आहेस ते बघ ? तू काय तुकारामाचा अवतार लागून गेला...