Posts

Showing posts with the label शांत

माझे जीवन गाणे एक सहज अभिव्यक्ती भाग तीन :

Image
माझे जीवन गाणे एक सहज अभिव्यक्ती भाग तीन : यापूर्वी मी तुम्हाला दिवेआगरच्या समुद्रकिनाऱ्यावर मला कसा विश्वरूप दर्शनाचा अनुभव आला ते सांगितले.  खरे विश्वरूपदर्शन हे भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायामध्ये कृष्णाने अर्जुनाला दाखवलं होतं तेही आपल्याला माहिती आहे. आणखीन ज्यावेळेला यशोदा मातेने कृष्णाला म्हंटले की तू चोरून लोणी खाल्लं आहेस; चल आ करून दाखव. तेव्हा कृष्णाने मोठ्ठ तोंड उघडलं आणि मातेस सारं विश्व त्याच्यामध्ये दिसलं.  आपण कधी शांत बसलो किंवा ध्यानाला बसलो तर त्या विष्णूच्या आकारातून हळूहळू संपूर्ण विश्व कल्पनेत आणायचं. आमच्या गुरूंनी सांगितलं की आकाशावर ध्यान करा. इथे तर आकाश तुकड्यांनी दिसतं, तारांनी व्यापलेला दिसतं. म्हणून समुद्र काठावर ध्यान केलं. अफाट आकाश दिसलं त्याच्यामध्ये नारायण मोठा मोठा होत गेला. मग डोंगराच्या माथ्यावर जाऊन महाबळेश्वरला केलं. मग विमानात केलं. 11 किलोमीटर वरती गेलोय. ह्या सगळ्यातून असं लक्षात आलं की; जे आकाश आपण इथून खालून बघत होतो त्या आकाशात अकरा किलोमीटर वरती गेलोय तरीसुद्धा शेवट विस्तार एवढा की; आपल्याला विनाअडथळा दिसते म्हणून सगळे काही दिसण...