Posts

स्त्री सौंदर्य आणि सनातन धर्म.

Image
■ रश्मिका मंदाना हिचा एक अतिशय सुंदर व सोज्वळ फोटो मी मित्रांच्या ग्रुप वर पोस्ट केला होता. त्यावर एका मित्राने असे म्हटले की, " प्रसाद भटा तू वेदांचे महत्व सांगतोस आणि असे फोटो कसे बरे टाकतोस? " ☆ त्यामुळे मला रागवण्याचे काहीच कारण नाही. उलट असे इतरांच्या मनात आले असू शकते. म्हणूनच एक विचारसरणी अधिक स्पष्ट करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्याला धन्यवाद देतो. आणि काही मुद्दे मांडतोय. 🫳 ■ वेद हे प्रत्येक सनातनी व्यक्तीला 4 आश्रमांप्रमाणे कर्म करण्यास सांगतात. चार आश्रम असे आहेत - ब्रह्मचर्य गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. गृहस्थ जीवनात उत्तम धनप्राप्त्ती , शृंगार, प्रजोत्पादन आदि कर्तव्ये दिलेली आहेत. ☆ वेद हे 4 पुरुषार्थ परिपूर्ण करण्यास सांगतात. ते असे - धर्म, अर्थ, काम व मोक्ष . ..धर्म व मोक्ष यांच्या 2 तीरां मध्ये अर्थ व काम योग्य रीत्या वाहिले की मग त्यास प्रत्यवाय नाही असेही सांगितले आहे. [ आयुर्वेद हा आहे; त्या 4 हि पुरुषार्थाचे मूळ म्हणजे आरोग्य सांभाळणारा उपवेद. ] ● आपल्याकडे मंदिरामध्ये अत्यंत सुंदर स्त्रियांची उत्तम शिल्पे आहेत. खजुराहो येथील मंदिरातील ' का...

धर्मसत्ता इतिहास व आजच्या जगाची खरी गरज.

Image
■ Vikings of European countries च्या इतिहासा संबंधीत सिरीयल्स पाहताना असे वाटले की खरा इतिहास जाणून घ्यायला पाहिजे. म्हणून ए आय ला विचारले त्यातून अशी माहिती मिळाली - ● AI on christianization of Europe - " युरोपमध्ये ख्रिश्चन धर्माची पहिली पावले पहिल्या शतकाच्या मध्यात पडली. प्रामुख्याने प्रेषित पॉलच्या मिशनरी प्रवासातून, ज्याने येशूच्या शिकवणी रोमन साम्राज्याच्या भूप्रदेशात आणल्या. युरोप १४०० वर्षांच्या धर्मांतर प्रक्रियेतून गेला. जुने धर्म संपून फक्त ख्रिश्चनीटी तेथे राहिली. ती प्रक्रिया सुरुवातीला मिशनरी पद्धतीची, शांततेची तर नंतर मात्र संघर्ष, भूलथापा व सत्तेचा बळाचा अनिर्बंध वापर करून देखील धर्मांतरे झाली. अखेर १५ व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत यूरोप पूर्ण क्रिश्चियन झाला. त्यानंतर आज पृथ्वीवर कोणताही पेगन धर्म अस्तित्वात नाही. "  ● असेच काहीसे आपल्या इथे घडत आहे म्हणून भारतातील इस्लामीकरणाचा इतिहास विचारला.  AI - " इस्लामी धर्माची भारतातील सुरुवात ७१२ मध्ये व्यापारी समुदायांनी शांततेत केली होती. तर नंतरच्या शतकांमध्ये १० व्या-११ व्या शतकात गझनवी छाप्यांप...

सुनिता विल्यम्स यांना अवकाश प्रवासात मिळालेले जीवन ज्ञान

Image
सुनिता विल्यम्स यांना अवकाश प्रवासात मिळालेले जीवन ज्ञान 'अवकाशातून मानवी हेवेदावे क्षुद्र वाटतात. अंतराळ प्रवासाने माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. जेव्हा तुम्ही अवकाशातून पृथ्वीकडे 'एक ग्रह' म्हणून पाहता, तेव्हा मानवी हेवेदावे किंवा मतभेद किती क्षुद्र आहेत, याची जाणीव होते,' अशी भावना अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी बुधवारी व्यक्त केली. 'जेव्हा तुम्ही अंतराळात पोहोचता, तेव्हा प्रत्येकजण हेच करतो, आपण सगळे आपले घर शोधू लागतो. माझे वडील भारतातील आहेत, तर माझी आई स्लोव्हेनियाची आहे. त्यामुळे साहजिकच मी ही दोन्ही ठिकाणे शोधत असते, ज्यांना मी घर म्हणू शकते आणि हेच तुमचे पहिले उद्दिष्ट असते,' असे त्या म्हणाल्या. मात्र पुढे 'ही सुरुवातीची 'आपले घर शोधण्याची भावना' हळूहळू पृथ्वीच्या एकतेच्या जाणिवेत बदलते,' असेही त्यांनी अधोरेखित केले. 'खरे सांगायचे तर मला असे वाटले की कुठल्याही गोष्टीवर कोणी भांडावेच का? मी लग्न केलेले आहे. मला नवरा आहे. आमच्यात भांडणे होतात. त्यामुळे वाद कसे असतात, हे मला समजते; परंतु प्रत्यक्षात असे का, ...

Sunita Williams on life lessons she got up above the world.

Image
Sunita Williams on life lessons she got from up above the world so high.  Travelling space has changed my perspective on life. When you look at Earth from space as 'one planet', you realize how petty human grievances or differences are," astronaut Sunita Williams said. My father is from India, my mother is from Slovenia. So naturally I'm looking for both places that I can call home, and that's your first goal," she said. But later, "this initial 'feeling of finding home' gradually changes into a sense of oneness with the Earth," Honestly, I thought, why should anyone fight over anything? I'm married. I have a husband. We fight. So I understand how arguments happen; but it really comes down to this, why is this happening, and when you look at the world from that perspective, everything seems so petty," Williams said. This is a very valuable and unique interview with Sunita Williams. The title is also very apt. The kind of ...

मानवता मतलब बेहतर बनना. मराठीतून.

Image
#मानवता मतलब बेहतर बनना । ● तुम्ही कुठल्याही जाती पंथ धर्माचे असा, तुम्हाला जुन्या नव्या ग्रंथांमधून काहीही सांगितलेले असो. तुम्ही त्याचे ॲनालिसिस करा. ● मला जाणवलेल्या काही कसोट्या सांगतो त्या कसोट्यांवर घासून पहा.... त्यातले चांगले ते स्वीकारा आणि जे कालबाह्य, चुकीचे आहे ते टाकून द्या. ● त्या कसोट्या अशा की -  माणुसकीला पारखं व्हायचं नाही.  कोणावर अत्याचार करायचे नाहीत.  कोणाचे फसवून वा जबरदस्तीने धर्मांतर करायचे नाही.  कोणाचेच शारीरिक, मानसिक, लैंगिक, आर्थिक वा धार्मिक असे कुठल्याच प्रकारचे शोषण करायचे नाही.  कोणाला कमी लेखायचे नाही.  समूह द्वेष नकोच. समूह स्वार्थासाठी देखील दुसऱ्या समूहांचे शोषण करायचे नाही.  जियो और जीने दो पाळायचं आणि जमेल तितकं सर्वांवर प्रेम करायचं.  ■ माणुसकीच्या या कसोट्या लावूनच जुन्या गोष्टी स्वीकारायच्या आणि त्यात न बसणाऱ्या टाकून द्यायच्या. असं माझं मत आहे.  पटलं तर होय म्हणा आणि पुढे ढकला.  नाही पटलं तर तुमचं सांगा की बिनधास्त! 🙏😍

What if sanatan decreases and islam increases?

Image
खालीद हुसेन यांचं द काइट रनर वाचल्यानंतर मी काही गोष्टी तुमच्यासमोर मांडल्या होत्या.  आता हे आणलंय. हे वाचल्यानंतर पुन्हा नवीन काही असले तर सांगेनच.  आजचा विषय असा की; अफगाणिस्तानातील आजची स्थिती काय आहे हे आपण पाहताच आहात. खालीद सारख्या मुसलमानांना जे सामान्य माणसासारखे जगू इच्छितात; त्यांना देखील किती सोसावं लागतं हेही आपण द काइट रनर या पुस्तकात पाहिलेच आहे.  अफगाणिस्तान म्हणजे पूर्वीचा आपला गांधार देश होता, अतिशय संपन्न होता, सुखी होता. इकडे ब्रह्मदेशापासून तिकडे गांधार पर्यंत आपला देश सनातन प्रधान होता. आणि जिथेजिथे धर्मांतराच्या माध्यमातून सनातन अल्पसंख्यांक झाला आणि मुस्लिम बहुल झाला तसंतसं भयानक स्थिती उत्पन्न झाली. आज अगदी संघ भाजपा विरोधी मित्रमंडळी देखील खाजगीत बोलतात की जर एकेक प्रांत मुस्लिम बहुल झाला तर पाकिस्तान अफगाणिस्तान सारखीच वाईट अवस्था होईल. हेही लक्षात घ्यायला हवे की तसे होत असताना तिथे राहणाऱ्या मुस्लिमांचे स्थिती सुद्धा अत्यंत बिकट होत जाते. त्यामुळे कुठल्याही प्रकारे सनातन अल्पसंख्यांक व मुस्लिम बहुल होणे हे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन कोणासाठीच चांग...

मानवता आणि हिंदुत्व

Image
● मी पूर्णपणे मानवतावादी आहे हे सर्वांना माहीत आहे. तरी देखील दलितांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांच्या बाजूने बोलत आलो आहे; तसेच हिंदू धर्म नष्ट होऊ नये म्हणून हिंदू धर्माच्या बाजूने देखील बोलतो व संघाच्या कामात आहे. ● हिंदू धर्माच्या रक्षणाची आजही गरज आहे. हिंदू धर्माच्या पतनाची जी कारणे आहेत त्यात  १. धर्मात एकी नसणे हे एक महत्वाचे कारण. # पण केवळ त्यामुळेच पराभव झाला असे म्हणता येत नाही. २. क्रूर आक्रमकानी समृद्धी मध्ये उच्च स्तरावर असलेल्या आणि त्यामुळे शांत निवांत असलेल्या हिंदूंची लांडगे तोड केली. येथे सत्ता स्थापन केली. त्या भयातून अनेक जण मुसलमान झाले. आज पाकिस्तान, बांगलादेश आणि भारत यात मुस्लिमांची जी प्रचंड संख्या दिसते; त्यामागे मुळात ते जबरदस्तीने धर्मांतरण केले हे आहे.  ३. फंदफितुरी त्यांच्या मदतीला आली. फंद फितुरी करणाऱ्यांच्या मध्ये अनेक मराठा सरदार हि होते. खुद्द छ. शिवाजी महाराजांना देखील त्यांचा नि:पात करण्यात आपला अमूल्य वेळ खर्च करावा लागला. ■ त्या आक्रमणाला प्रतिबंध घालण्यासाठी बड फुकन, महाराणा प्रताप व शिवाजी महाराज यांचे अतुलनीय कार्य प्रभावी व यशस्व...