Posts

Showing posts from October, 2025

सौहार्द हेच सर्वात जास्त हितकर आहे. विवेकानंदांची शिकवण.

Image
■■ स्वामी विवेकानंदांनी बेलूर मठाची स्थापना करताना देखील सौहार्द या गोष्टीला हायलाईट केले होते. बघा त्यांच्या या पुस्तकातील उतारा.   पुस्तक : श्री विवेकानंद चरित्र अर्थ : ●बेलूर-मठाच्या उद्दिष्टांबद्दल विवेकानंद स्वामी म्हणाले: 'हे एक असे केंद्र असेल जिथे श्री रामकृष्णांच्या जीवनात दाखवल्याप्रमाणे सर्व पंथ आणि श्रद्धा यांच्यातील भव्य सुसंवाद साधला जाईल आणि त्याचे आचरण केले जाईल. आणि केवळ त्याच्या वैश्विक पैलूमध्ये धर्माचा उपदेश केला जाईल.  आणि या ठिकाणाहून वैश्विक सहिष्णुतेच्या हेतुपूर्वक सद्भावना, शांती आणि सौहार्दाचा तेजस्वी संदेश निघेल. जो संपूर्ण जगात पसरेल. जर आपण निष्काळजी झालो तर सांप्रदायिकता पसरण्याच्या धोक्याबद्दल त्यांनी सर्वांना इशारा दिला. धर्माचा अर्थ प्रजा धारण करणारा तो धर्म.  उध्वस्त करणारे ते अधर्म. सौहार्दा अभावी ती उध्वस्त होत आहे. हे बदलायला हवे. ■ दरवर्षी मला हा अनुभव येतो - काही बांधव दिवाळीच्या शुभेच्छा देतात किंवा वर्षभरात कुठल्यातरी हिंदू सणाच्या शुभेच्छा देतात. ● या व्यतिरिक्त आपण वृत्तपत्रांमध्ये वाचतो...

मानवतेला देव, धर्म यांची पूर्व अट नाही.

Image
     सहज एक आठवण सांगत आहे -  ● शिकागो च्या Flight वर मला एक पोलंडचा नागरिक भेटला होता. तो नास्तिक आहे. त्याने असे म्हटले की; माणुसकीने वागण्यासाठी मला कुठल्याही देवाची, धर्माची गरज नाही. देव, धर्म हे माणसाला चांगल्या मार्गावर आणतात हे ठीक आहे. पण काही वेळा वाद आणि भांडणाला निमित्त होऊन बसतात. ● धार्मिक, नास्तिक, निधर्मी, ex muslims, कम्युनिस्ट ...अशा सगळ्यांपर्यंत माणुसकीचा विषय पोहोचवण्यासाठी जर नीट खटपट करायची असेल; तर असे विचार मांडले पाहिजेत की ज्यामध्ये देव धर्म राष्ट्र याची गरज पडणार नाही. Right? ● जग शांततेत राहण्यासाठी आणि माणसाची माणुसकी वाढण्यासाठी कृण्वन्तो विश्वं अर्यम्, islamization of world अशा कुठल्याही slogans ची गरज नाही. ती कदाचित दुसऱ्याला आपल्यामध्ये ओढण्याची वाक्य देखील ठरू शकतात आणि त्यामुळे संघर्ष होऊन माणुसकीला हानीच पोचू शकते. आपापल्या धर्मात रहा, त्याचे पालन करा आणि धर्मात जी दुसऱ्यावर आक्रमणाची शिकवणूक असेल ती काढून टाका. पुढच्या पिढीला एक अधिक चांगलं जग देण्यासाठी हे उपयोगी ठरेल. पोलंड च्या माणसाशी बोलत असताना iceland चे मनमोहक द्रुष्य दि...

हिंदू धर्म टिकवणे.

Image
आपल्या दृष्टीने एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे हिंदूधर्म टिकवणे. त्यासाठी काय काय करावे लागेल? ते करत असताना भाग एक म्हणजे हिंदू संघटन, भाग दोन हिंदू अभिमानाने राहणे, भाग तीन आक्रमणाच्या खुणा मिटवणे. आणि हे सगळं डॉक्टर हेडगेवार यांच्यापासून आता मोहनराव, मोदीजीपर्यंत सगळ्यांनी केले. त्यात आपलाही सहभाग राहिला आहे. संघटन, शक्ती व राजकीय विजय त्या माध्यमातून झालेल्या अनेक कृती या सगळ्यातून बरेच काही फलित आपल्या हाती आले आहे नक्कीच.  आताचा नवा मुद्दा असा आहे की आपण आपल्या डोक्यात ' सिविल वाॅर चा / धर्मयुद्धाचा एक शेवटचा ठोका ' हे घेऊन बसलो आहोत का? तसे असेल तर मात्र आपण थोडसं चुकतोय. हा टप्पा समोरून जर आला तरच या अर्थाने घेण्यास योग्य. पण तो आपल्या डोक्यातला असता कामा नये. कृष्णा नीती या नावाखाली आपण काही भ्रामक कल्पना मनात बाळगून आहोत आणि त्यामुळेच आपण महाभारताप्रमाणे ह्या धर्मयुद्धाची कल्पना करीत आहोत. परंतु कृष्ण निती ला बरेच कांगोरे होते त्यात कृष्णशिष्टाई होती त्यात दृष्टांचा संहार होता सरसकट गल्लीबोळातील युद्ध किंवा नागरी लोकांवर हल्ला असे नव्हते. किंवा कोणीही का...