Posts

पुढे ठाकला पांडुरंग

Image
येथेच माझा नारायण केशव विठ्ठल पांडुरंग प्रकटला - हे तर अल्बम मधून शोधून काढलेले जुने फोटोज आहेत. दिवे आगर या गावातले. सलग ५ किमीचा स्वच्छ, सुंदर आणि शांत किनारा लाभलेले कोकणातील एक गाव. मावशीच्या घरातून निघाल्यावर दोन्ही बाजूला अशा उंच उंच माडाच्या वाड्यांमधून जाणारा लाल मातीचा वळणांचा रस्ता. मग भगवान विष्णूंचं एक सुंदर मंदिर. मग लागतंय केतकीचं हिरवं पिवळं बन आणि मग येतो कधी एकदा डोळे भरून पाहतो असा पण डोळ्यात न मावणारा तो अथांग सागर. तो दिसतानाच काय पण आता तो क्षण आठवताना सुद्धा मनाला आनंदाचे उधाण येतंय. एक काळ असा होता की या किनाऱ्यावर मी तासन् तास बसलेलो आहे. कधी कधी अगदी एकटाच... संपूर्ण पाच किलोमीटरच्या स्ट्रेच मध्ये दुसरा एकही माणूस नाही मी एकटाच माणूस आहे... असं पण घडलेले आहे. तर असाच एका सुंदर सकाळी ह्याच किनाऱ्यावर पोहोचलो. आधी थोडं पाण्यात चालणं - पळणं झालं. वाळूच्या एका छोट्याशा उंचवट्यावर बसून पाण्यात पाय सोडले आणि शांतपणे बसलो. दर मिनिटाला किनाऱ्यावर आदळणाऱ्या शुभ्र फेसाळत्या लाटांनी अंगावर काटा येत होता. त्यानंतर लक्ष गेलं ते किनाऱ्यापासून आत दूरवर पसरलेल्या श...

अनुभव के कुछ अल्फाज़ बयान कर रहा हूँ ।

Image
■ 1 ~ Photography & Words ki creativity के आधार पर ~ अनुभव के कुछ अल्फाज़ बयान कर रहा हूँ l  अच्छा लगे तो शेअर जरूर करें l 📱 ■ 2 ~ किसका व्यवहार कैसा है यह हमे समजता नही ऐसी तो कोई बात नही । फिर भी हम प्यार से पेश आते है इसका ये मतलब नही के हम भोले भाले है । यह है कि हम रिश्ता निभाना चाहते है ।  फिर भी आप ना चाहो तो दूरी ही सही । 🫎 ■ 3~ जब साथ छुटता है तो दर्द तो होता है ।   कभी किसी प्यारे दुलारे को भगवान उठा लेते है ।  ● तो कभी कोई अपने ही हमारा फायदा उठा के चले जाते है ।  दर्द तो होता है; पर फिर भी हमे आगे तो चलना ही चलना है । 📌 ■ 4 ~ Sex is integral, essential and very lovely part of life. [ Sex as in love, romance, physical relation, thinking of it or watching movies etc... everything. ] Kamal exciting Unless it takes toll on your body mind and brain. That toll could be heavy to very heavy.  Be cautious while enjoying it by any means. 🪷 आपका अपना; डॉ. प्रसाद फाटक पुणे  9822697288

जाती द्वेष नको. क्षत्रियांबद्दल आम्हाला अभिमान आहे.

Image
■ आपण जाती बद्दल कधीच बोलत नव्हतो. इतके वेगवेगळ्या जाती चे मित्र झाले पण कधी कोणाला जात विचारली सुद्धा नाही.  पण गेल्या काही काळात काही विशिष्ट कारणाने जातीचे उल्लेख करावे लागले. आधी मानवते चा भाग म्हणून दलितांची बाजू घेतली आणि नंतर अशी परिस्थिती आली की ब्राह्मणांची पण बाजू घ्यावी लागली.  त्यामुळे मला थोडंसं असं वाटायला लागले की आपण फक्त मराठा यांच्या बाजूने फारसं बोललो नाहीये.  ■ खरं म्हणजे मराठा, क्षत्रिय हा समाजाचा रक्षणकर्ता. त्यातीलही मुकुटमणी आमचा लाडका शिवाजी राजा हा हिंदूंचा त्राता.. असे अनेक मुद्दे पूर्वी मांडलेले होते. पण हल्ली या सगळ्या मराठा आरक्षणाच्या प्रकरणात त्यांच्या बाजूने फारसं बोललं गेलं नव्हतं... ....पण आज नेमकं असं घडलं - दोन मित्रांची चर्चा चालू असताना एकाने मराठ्यांबद्दल अनुदार उद्गार काढले. ते कुणालाच रुचणारे नव्हते. पण मी मात्र त्याची चांगलीच खरडपट्टी काढली.  या लेखनामागे २ हेतु असे आहेत - १ ● आपण मराठा विरोधी नाही. आपल्याला देश रक्षण करणाऱ्या क्षत्रियांचा अभिमान आहे. २ ● जातीनुसार आता बर्याच व्यक्ती ती जुनी जातीनिहाय काम...

सौहार्द हेच सर्वात जास्त हितकर आहे. विवेकानंदांची शिकवण.

Image
■■ स्वामी विवेकानंदांनी बेलूर मठाची स्थापना करताना देखील सौहार्द या गोष्टीला हायलाईट केले होते. बघा त्यांच्या या पुस्तकातील उतारा.   पुस्तक : श्री विवेकानंद चरित्र अर्थ : ●बेलूर-मठाच्या उद्दिष्टांबद्दल विवेकानंद स्वामी म्हणाले: 'हे एक असे केंद्र असेल जिथे श्री रामकृष्णांच्या जीवनात दाखवल्याप्रमाणे सर्व पंथ आणि श्रद्धा यांच्यातील भव्य सुसंवाद साधला जाईल आणि त्याचे आचरण केले जाईल. आणि केवळ त्याच्या वैश्विक पैलूमध्ये धर्माचा उपदेश केला जाईल.  आणि या ठिकाणाहून वैश्विक सहिष्णुतेच्या हेतुपूर्वक सद्भावना, शांती आणि सौहार्दाचा तेजस्वी संदेश निघेल. जो संपूर्ण जगात पसरेल. जर आपण निष्काळजी झालो तर सांप्रदायिकता पसरण्याच्या धोक्याबद्दल त्यांनी सर्वांना इशारा दिला. धर्माचा अर्थ प्रजा धारण करणारा तो धर्म.  उध्वस्त करणारे ते अधर्म. सौहार्दा अभावी ती उध्वस्त होत आहे. हे बदलायला हवे. ■ दरवर्षी मला हा अनुभव येतो - काही बांधव दिवाळीच्या शुभेच्छा देतात किंवा वर्षभरात कुठल्यातरी हिंदू सणाच्या शुभेच्छा देतात. ● या व्यतिरिक्त आपण वृत्तपत्रांमध्ये वाचतो...

मानवतेला देव, धर्म यांची पूर्व अट नाही.

Image
     सहज एक आठवण सांगत आहे -  ● शिकागो च्या Flight वर मला एक पोलंडचा नागरिक भेटला होता. तो नास्तिक आहे. त्याने असे म्हटले की; माणुसकीने वागण्यासाठी मला कुठल्याही देवाची, धर्माची गरज नाही. देव, धर्म हे माणसाला चांगल्या मार्गावर आणतात हे ठीक आहे. पण काही वेळा वाद आणि भांडणाला निमित्त होऊन बसतात. ● धार्मिक, नास्तिक, निधर्मी, ex muslims, कम्युनिस्ट ...अशा सगळ्यांपर्यंत माणुसकीचा विषय पोहोचवण्यासाठी जर नीट खटपट करायची असेल; तर असे विचार मांडले पाहिजेत की ज्यामध्ये देव धर्म राष्ट्र याची गरज पडणार नाही. Right? ● जग शांततेत राहण्यासाठी आणि माणसाची माणुसकी वाढण्यासाठी कृण्वन्तो विश्वं अर्यम्, islamization of world अशा कुठल्याही slogans ची गरज नाही. ती कदाचित दुसऱ्याला आपल्यामध्ये ओढण्याची वाक्य देखील ठरू शकतात आणि त्यामुळे संघर्ष होऊन माणुसकीला हानीच पोचू शकते. आपापल्या धर्मात रहा, त्याचे पालन करा आणि धर्मात जी दुसऱ्यावर आक्रमणाची शिकवणूक असेल ती काढून टाका. पुढच्या पिढीला एक अधिक चांगलं जग देण्यासाठी हे उपयोगी ठरेल. पोलंड च्या माणसाशी बोलत असताना iceland चे मनमोहक द्रुष्य दि...

हिंदू धर्म टिकवणे.

Image
आपल्या दृष्टीने एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे हिंदूधर्म टिकवणे. त्यासाठी काय काय करावे लागेल? ते करत असताना भाग एक म्हणजे हिंदू संघटन, भाग दोन हिंदू अभिमानाने राहणे, भाग तीन आक्रमणाच्या खुणा मिटवणे. आणि हे सगळं डॉक्टर हेडगेवार यांच्यापासून आता मोहनराव, मोदीजीपर्यंत सगळ्यांनी केले. त्यात आपलाही सहभाग राहिला आहे. संघटन, शक्ती व राजकीय विजय त्या माध्यमातून झालेल्या अनेक कृती या सगळ्यातून बरेच काही फलित आपल्या हाती आले आहे नक्कीच.  आताचा नवा मुद्दा असा आहे की आपण आपल्या डोक्यात ' सिविल वाॅर चा / धर्मयुद्धाचा एक शेवटचा ठोका ' हे घेऊन बसलो आहोत का? तसे असेल तर मात्र आपण थोडसं चुकतोय. हा टप्पा समोरून जर आला तरच या अर्थाने घेण्यास योग्य. पण तो आपल्या डोक्यातला असता कामा नये. कृष्णा नीती या नावाखाली आपण काही भ्रामक कल्पना मनात बाळगून आहोत आणि त्यामुळेच आपण महाभारताप्रमाणे ह्या धर्मयुद्धाची कल्पना करीत आहोत. परंतु कृष्ण निती ला बरेच कांगोरे होते त्यात कृष्णशिष्टाई होती त्यात दृष्टांचा संहार होता सरसकट गल्लीबोळातील युद्ध किंवा नागरी लोकांवर हल्ला असे नव्हते. किंवा कोणीही का...

उत्सव नात्यांचा?

Image
उत्सव नात्यांचा? :  ● ' झी मराठी, उत्सव नात्यांचा ' ही स्लोगन आपण रोज ऐकतो. पण प्रत्यक्षात मात्र आपल्या अवतीभवती बघितलं तर नात्यांचा ' येळकोट' च झालेला आहे. ¤ 'मी मराठी, येळकोट नात्यांचा! ' अशी अवस्था झाली आहे. ● संवादाचा अभाव, अहंकार, सॉरी चा अभाव, आळस, स्वार्थ, पैशाचा हव्यास, कोतेपणा... ¤ पूर्वी मी आणि माझं कुटुंब एवढं च बघायचे आता मी आणि फक्त मी एवढेच पाहिले जाते आहे. ● ह्या आणि अशा अनेक कारणांमुळे आज पूर्वी कधी नसेल एवढी नात्यांची अवस्था बिकट झाली आहे.  ● संस्कारांचा अभाव हे कारण इथे लागू होत नाही. कारण जिथे खूप चांगले संस्कार झालेत असे माझ्या पिढीतले लोक सुद्धा या गर्दिश मध्ये आहेत! ● विचार विमार्षासाठी जारी केलं आहे. ~ प्रसाद फाटक पुणे.  9822697288