मानवता आणि हिंदुत्व
● मी पूर्णपणे मानवतावादी आहे हे सर्वांना माहीत आहे. तरी देखील दलितांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांच्या बाजूने बोलत आलो आहे; तसेच हिंदू धर्म नष्ट होऊ नये म्हणून हिंदू धर्माच्या बाजूने देखील बोलतो व संघाच्या कामात आहे. ● हिंदू धर्माच्या रक्षणाची आजही गरज आहे. हिंदू धर्माच्या पतनाची जी कारणे आहेत त्यात १. धर्मात एकी नसणे हे एक महत्वाचे कारण. # पण केवळ त्यामुळेच पराभव झाला असे म्हणता येत नाही. २. क्रूर आक्रमकानी समृद्धी मध्ये उच्च स्तरावर असलेल्या आणि त्यामुळे शांत निवांत असलेल्या हिंदूंची लांडगे तोड केली. येथे सत्ता स्थापन केली. त्या भयातून अनेक जण मुसलमान झाले. आज पाकिस्तान, बांगलादेश आणि भारत यात मुस्लिमांची जी प्रचंड संख्या दिसते; त्यामागे मुळात ते जबरदस्तीने धर्मांतरण केले हे आहे. ३. फंदफितुरी त्यांच्या मदतीला आली. फंद फितुरी करणाऱ्यांच्या मध्ये अनेक मराठा सरदार हि होते. खुद्द छ. शिवाजी महाराजांना देखील त्यांचा नि:पात करण्यात आपला अमूल्य वेळ खर्च करावा लागला. ■ त्या आक्रमणाला प्रतिबंध घालण्यासाठी बड फुकन, महाराणा प्रताप व शिवाजी महाराज यांचे अतुलनीय कार्य प्रभावी व यशस्व...